शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

घरांसह शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:24 IST

म्हाकवे : ज्या-ज्या घरात पुराचे पाणी शिरले त्या सर्व पूरग्रस्तांच्या घरांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने ...

म्हाकवे : ज्या-ज्या घरात पुराचे पाणी शिरले त्या सर्व पूरग्रस्तांच्या घरांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिले. एकही नुकसानग्रस्त कुंटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या आणि पंचनामे काटेकोर व पारदर्शी होण्यावर भर देऊन लाभार्थीच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या फलकावर लावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.

बानगे (ता. कागल) येथील पूरपरिस्थितीची मंत्री मुश्रीफ यांनी पाहणी केली. यावेळी विस्थापित २२५ कुटुंबांना हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्यावतीने अन्नधान्याचे वाटप झाले.

यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, डॉ. अभिजित शिंदे, तलाठी सुप्रिया भांगे, ग्रामसेवक पी. के. पाटील उपस्थित होते. मुश्रीफ यांनी भोपळे गल्ली, इंगवले गल्ली, आंबी गल्ली, चावडी गल्ली, सावंत गल्ली, सुतार गल्ली, चावरेकर कोपरा येथील पूरग्रस्तांना भेटी दिल्या.

चौकट : रात गयी, बात गयी असे होऊ नये

पाटबंधारे, महसूल स्थानिक प्रशासनाच्या मदतीने प्रत्येक गावातील पूररेषा निश्चित करून पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन कसे करता येईल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. पूर निघून गेला की पुढील पुरापर्यंत सर्वच शांत असते. ‘रात गयी बात गयी’ असे व्हायला नको. याचा सर्वांनीच आवर्जून पाठपुरावा करावा आणि कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न व्हावेत, अशीही अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

२५ बानगे मुश्रीफ पाहणी

बानगे येथे महापूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या घरांच्या पडझडीची पाहणी करताना मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, रवींद्र पाटील, विलास पाटील, रमेश सावंत उपस्थित होते.