शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पुलासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:46 IST

जयसिंगपूर : कोथळी-हरिपूर दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवर नव्याने उभारल्या जात असलेल्या पुलाची पाहणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ...

जयसिंगपूर : कोथळी-हरिपूर दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवर नव्याने उभारल्या जात असलेल्या पुलाची पाहणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शनिवारी केली. पुलाची उभारणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी पूल उभारणीसाठी या परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे संपादन शासनाने केले आहे, अशा शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याबाबतची माहिती ग्रामस्थांनी राज्यमंत्री यड्रावकर यांना दिली. यावर मंत्री यड्रावकर यांनी प्रांताधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत तातडीने मोबदला देण्याबाबतचे आदेश दिले. २१० मीटर लांबीच्या या पुलासाठी २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मुख्य पुलासाठी नाबार्डकडून १५ कोटी, तर दोन्ही बाजूच्या जोड रस्त्यांसाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामधून १० कोटी, तर भूसंपादनासाठी ६.५ कोटीची तरतूद केली होती. २०१९ मध्ये पुलाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. सध्या पुलाचे दोन्ही बाजूकडून साठ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जून २०२१ पूर्वी पूर्ण करण्याबाबतचे नियोजन झाले असल्याचे अभियंता रोकडे यांनी सांगितले.

सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणारा पूल वाहतुकीस सोयीस्कर ठरणार आहे. यावेळी पं. स. उपसभापती राजगोंडा पाटील, सरपंच वृषभ पाटील, देवगोंडा पाटील, संजय नांदणे, गौतम इंगळे, रावसो बोरगावे, शीतल पाटील उपस्थित होते.

फोटो - २७०२२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - कोथळी-हरिपूर पुलाची पाहणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.