शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

न्यायालयाने स्थगिती उठविल्याने समायोजनाला गती

By admin | Updated: December 11, 2014 00:31 IST

सीईओ सुभेदार : २०१३ च्या पटसंख्येनुसारच समायोजन

कोल्हापूर : उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्यामुळे शिक्षक समायोजनाची प्रक्रिया गतिमान करणार आहे. ३० सप्टेंबर २०१३ रोजीच्या पटसंख्येवर आधारित समायोजन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.सीईओ सुभेदार म्हणाले, हक्काचे शिक्षण कायद्यानुसार ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येवर आधारित २४ जून २०१४ पासून अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू केली. ११ स्तरांवरून समायोजनाची प्रक्रिया १९ आॅगस्ट २०१४ रोजीपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केली. अतिरिक्त अध्यापकांची समायोजन प्रक्रिया सुरू झाली. शिक्षक संघटनांचे अध्यक्ष यांना ‘अतिरिक्त’च्या प्रक्रियेतून वगळले. उपाध्यक्षांना वगळले नाही. दरम्यान, जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त शिक्षक संघटनांचे उपाध्यक्ष यांना वगळले नाही, हा मुद्दा पुढे करीत भिवाजी काटकर (रा. पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा), रवींद्र शेंडे (रा. बोलकेवाडी, ता. आजरा), संजय जाधव (रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) या तीन शिक्षकांनी जिल्हा परिषदेविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. दिवाणी न्यायालयाने समायोजन प्रक्रियेला स्थगिती दिली. जिल्हा न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. जिल्हा न्यायालयानेही स्थगितीचा आदेश कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा आव्हान याचिका दाखल केली. सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आहे; त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन गतीने केले जाणार आहे. सध्या २४२ अध्यापक अतिरिक्त आहेत. सहा डोंगराळ तालुक्यांत ८७ जागा रिक्त आहेत. अतिरिक्त अध्यापकांचे रिक्त जागांवर समायोजन केले जाईल. त्यानंतर अतिरिक्त राहिलेल्या अध्यापकांसंबंधी निर्णय घेतला जाईल. सप्टेंबर २०१३ नुसारच समायोजन केले जाणार आहे. सोयीस्करपणे ‘मौन’स्थगितीमुळे समायोजनाची प्रक्रिया ठप्प झाली. परिणामी रिक्त जागा भरता आल्या नाहीत. संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. या नुकसानीस कोण जबाबदार? अशी विचारणा केल्यावर सीईओ सुभेदार यांनी सोयीस्करपणे ’मौन’ बाळगणे पसंत केले.