शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

न्यायालयाने स्थगिती उठविल्याने समायोजनाला गती

By admin | Updated: December 11, 2014 00:31 IST

सीईओ सुभेदार : २०१३ च्या पटसंख्येनुसारच समायोजन

कोल्हापूर : उच्च न्यायालयाने स्थगिती उठविल्यामुळे शिक्षक समायोजनाची प्रक्रिया गतिमान करणार आहे. ३० सप्टेंबर २०१३ रोजीच्या पटसंख्येवर आधारित समायोजन केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.सीईओ सुभेदार म्हणाले, हक्काचे शिक्षण कायद्यानुसार ३० सप्टेंबर २०१३ च्या पटसंख्येवर आधारित २४ जून २०१४ पासून अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू केली. ११ स्तरांवरून समायोजनाची प्रक्रिया १९ आॅगस्ट २०१४ रोजीपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केली. अतिरिक्त अध्यापकांची समायोजन प्रक्रिया सुरू झाली. शिक्षक संघटनांचे अध्यक्ष यांना ‘अतिरिक्त’च्या प्रक्रियेतून वगळले. उपाध्यक्षांना वगळले नाही. दरम्यान, जिल्हास्तरीय मान्यताप्राप्त शिक्षक संघटनांचे उपाध्यक्ष यांना वगळले नाही, हा मुद्दा पुढे करीत भिवाजी काटकर (रा. पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा), रवींद्र शेंडे (रा. बोलकेवाडी, ता. आजरा), संजय जाधव (रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा) या तीन शिक्षकांनी जिल्हा परिषदेविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. दिवाणी न्यायालयाने समायोजन प्रक्रियेला स्थगिती दिली. जिल्हा न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. जिल्हा न्यायालयानेही स्थगितीचा आदेश कायम ठेवला. मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा आव्हान याचिका दाखल केली. सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आहे; त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन गतीने केले जाणार आहे. सध्या २४२ अध्यापक अतिरिक्त आहेत. सहा डोंगराळ तालुक्यांत ८७ जागा रिक्त आहेत. अतिरिक्त अध्यापकांचे रिक्त जागांवर समायोजन केले जाईल. त्यानंतर अतिरिक्त राहिलेल्या अध्यापकांसंबंधी निर्णय घेतला जाईल. सप्टेंबर २०१३ नुसारच समायोजन केले जाणार आहे. सोयीस्करपणे ‘मौन’स्थगितीमुळे समायोजनाची प्रक्रिया ठप्प झाली. परिणामी रिक्त जागा भरता आल्या नाहीत. संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. या नुकसानीस कोण जबाबदार? अशी विचारणा केल्यावर सीईओ सुभेदार यांनी सोयीस्करपणे ’मौन’ बाळगणे पसंत केले.