शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सुरू

By admin | Updated: December 18, 2014 00:10 IST

कुटुंबीयांचाही सहभाग : ठोस कार्यवाही झाल्याशिवाय माघार नाही

कोल्हापूर : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, झांबरे, वारणा, चंदगड येथील प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांनी आज, बुधवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या सुरू केले. विशेष म्हणजे या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांनी आपल्या बायको मुलांसह भाग घेतला आहे. जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहोळ, वारणा आदी ठिकाणच्या प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक बैठक झाल्या, निर्णयही झाले, परंतु अंमलबजावणी काही झालेली नाही. अंमलबजावणीकरीता संबंधित सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्याची निर्गत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी तहसीलदार यांच्यासह तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती,परंतु त्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आपले सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची अक्षरश: ससेहोलपट सुरू आहे. त्यामुळेच आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.ठिय्या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांनी आपल्या बायका-मुलांसह भाग घेतला असून सोबत भांडी, लाकुडसामान आणले आहे. जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत तेथेच अन्न शिजवून खाणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व अशोक जाधव, धनाजी गुरव, मारुती राऊत, यशवंत घडाशी, के. डी. घोलप, हरी पाटील, धोंडिबा बोडके, विष्णू पेजे, धोंडिबा पोवार, रमेश पोवार, धोंडिबा पाटील आदी करत आहेत. (प्रतिनिधी)या आहेत मागण्या...सर्फनाला लाभक्षेत्रातील जमिनीचे आदेश व ताबा देण्यात यावा, लाभक्षेत्रातील संपादनपात्र जमीन तातडीने ताब्यात घेऊन ती सर्व प्रकल्पग्रस्तांना वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, उचंगी प्रक ल्पातील मौजे जेवूरमधील खातेदारांची ६५ टक्के रक्कम कपात करून घेतलेली नाही, ती रक्कम भरून घ्यावी, लाभक्षेत्रातील संपादन केलेली जमीन वाटपास तातडीने उपलब्ध करावी, आंबेओहोळ लाभक्षेत्रातील संपादन पात्र जमीन संपादनाची प्रक्रिया रखडलेली आहे, ती तातडीने सुरू करावी, प्रस्तावित नवीन गावठाणची निश्चिती करावी, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत.