शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या सुरू

By admin | Updated: December 18, 2014 00:10 IST

कुटुंबीयांचाही सहभाग : ठोस कार्यवाही झाल्याशिवाय माघार नाही

कोल्हापूर : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, झांबरे, वारणा, चंदगड येथील प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांनी आज, बुधवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या सुरू केले. विशेष म्हणजे या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांनी आपल्या बायको मुलांसह भाग घेतला आहे. जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्फनाला, उचंगी, आंबेओहोळ, वारणा आदी ठिकाणच्या प्रकल्पग्रस्त व अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक बैठक झाल्या, निर्णयही झाले, परंतु अंमलबजावणी काही झालेली नाही. अंमलबजावणीकरीता संबंधित सर्व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्याची निर्गत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी तहसीलदार यांच्यासह तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती,परंतु त्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आपले सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची अक्षरश: ससेहोलपट सुरू आहे. त्यामुळेच आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्तांनी घेतला आहे.ठिय्या आंदोलनात प्रकल्पग्रस्तांनी आपल्या बायका-मुलांसह भाग घेतला असून सोबत भांडी, लाकुडसामान आणले आहे. जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत तेथेच अन्न शिजवून खाणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व अशोक जाधव, धनाजी गुरव, मारुती राऊत, यशवंत घडाशी, के. डी. घोलप, हरी पाटील, धोंडिबा बोडके, विष्णू पेजे, धोंडिबा पोवार, रमेश पोवार, धोंडिबा पाटील आदी करत आहेत. (प्रतिनिधी)या आहेत मागण्या...सर्फनाला लाभक्षेत्रातील जमिनीचे आदेश व ताबा देण्यात यावा, लाभक्षेत्रातील संपादनपात्र जमीन तातडीने ताब्यात घेऊन ती सर्व प्रकल्पग्रस्तांना वाटपाची प्रक्रिया सुरू करावी, उचंगी प्रक ल्पातील मौजे जेवूरमधील खातेदारांची ६५ टक्के रक्कम कपात करून घेतलेली नाही, ती रक्कम भरून घ्यावी, लाभक्षेत्रातील संपादन केलेली जमीन वाटपास तातडीने उपलब्ध करावी, आंबेओहोळ लाभक्षेत्रातील संपादन पात्र जमीन संपादनाची प्रक्रिया रखडलेली आहे, ती तातडीने सुरू करावी, प्रस्तावित नवीन गावठाणची निश्चिती करावी, आदी मागण्या प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत.