शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

प्रकल्प खर्च तब्बल ३०६ कोटींवर

By admin | Updated: March 18, 2016 00:40 IST

कॉमन मॅन संघटनेकडून माहिती : टोलमुक्तीसाठी आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची किंमत १९६ कोटींवरून तब्बल ३०६ कोटींवर नेला आहे, अशी माहिती येथील कॉमन मॅन संघटनेने प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे ही किंमत वाढली आहे. वाढलेल्या रकमेची वसुली टोलच्या माध्यमातून वाहनधारकांकडून केली जाणार आहे म्हणून या टोलमुक्तीच्या आंदोलनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पत्रकात म्हटले आहे, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लिमिटेड कंपनी एकूण ५२.६१ किलोमीटरचा हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर २२ वर्षे ९ महिने टोल वसूल करणार आहे. या दरम्यान दोन उड्डाणपूल, ८२ मोऱ्या, ३२ चौक सुधारणा, २६९८ वृक्षतोड, १५ लहान पूल, १०.५७ किलोमीटरचे सेवा रस्ते, ३४ बस वे, १६ पार्किंग प्लॉट, २६ हजार ९८० नवीन वृक्षारोपण, ५५.५५ हेक्टर भूसंपादन अशी कामे आहेत. दरम्यान, कामे वेळेत पूर्ण न झाल्याने कंपनीस दिवसाला दीड लाखांचा दंड वसूल लावला आहे. सध्या प्रकल्पाचे फक्त ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे परंतु, कंपनीकडून काम ९५ टक्के झाल्याचे सांगितले जात आहे. विलंबामुळे ३०६.९० कोटी संपूर्ण काम पूर्ण होण्यास खर्च येणार आहे. इतके पैसे कंपनी वाहनधारकांकडून टोलच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे आयआरबीप्रमाणे शासनाने या प्रकल्पाची सर्व कागदपत्रांची विशेष समिती स्थापन करून चौकशी करावी. यावर बाबा इंदूलकर, अमित अतिग्रे, स्वप्निल शिंदे, जीवन कदम यांच्या सह्या आहेत.माहितीबाबत गोपनीयतारस्त्याच्या माहितीसंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमालीची गोपनीयता ठेवली जात आहे. काम पूर्णत्वाबाबत कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेल्या दाव्यात मोठी तफावत आहे, अशा परिस्थितीमध्ये ठेकेदार कंपनीने टोल वसुलीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. कामाच्या दर्जासंबंधी उपस्थित केलेले अनेक प्रश्न, वाढीव खर्च, अपूर्ण कामे असताना टोलवसुलीच्या हालचाली या अनुषंगाने हा प्रकल्पही वादग्रस्त होण्याची चिन्हे आहेत. प्रत्यक्षात ६० टक्केही काम नाही : मिणचेकरआंदोलनाचा इशारा : टोल सुरू करू देणार नाहीशिरोली : कोल्हापूर - सांगली रस्त्याचे प्रत्यक्षात ६० टक्केही काम झालेले नाही आणि सुप्रीम कंपनी टोलवसुलीसाठी ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा चुकीचा दावा करीत आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण झालेले शासनाचे लेखी पत्र दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. या कंपनीच्या कामाची मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्याप चौपदरीकरणाचे ४० टक्के काम अपूर्ण आहे. या कंपनीला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे, तरीही कंपनीने काम पूर्ण केलेले नाही. आता टोलवसुली करण्यासाठी कंपनी ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगत आहे. परंतु, प्रत्यक्ष शासनाने काम पूर्ण झाले आहे, असे लेखी पत्र दिल्याशिवाय टोलवसुली सुरू करून देणार नाहीे, असे आमदार डॉ. मिणचेकर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल खवरे, उपसरपंच राजू चौगुले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, गोविंद घाटगे, रणजित केळुसकर, हरी पुजारी, लियाकत गोलंदाज, सतीश रेडेकर, संजय चौगुले, मुकुंद नाळे, दीपक यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते. टोलविरोधात रस्त्यावर उतरणार : धैर्यशील मानेआळते : कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असताना ‘सुप्रीम इन्फास्ट्रक्चर’ कंपनीने टोल गोळा करण्यासाठी मोठी तयारी केली आहे. कोल्हापूर शहराच्या धर्तीवर हा टोल माफ करावा; अन्यथा याविरोधात मोठा लढा उभा करून याला हद्दपार करू, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.माने म्हणाले, शिरोळ व हातकणंगले या तालुक्यांतील लोकांना याचा फटका बसणार आहे. रस्त्याचा दर्जा न तपासता टोल सुरू करण्यास मान्यता दिल्यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यास भाग पाडू.