शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो : बाबा आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:11 IST

आजरा : फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आजच्या अंधारमय काळात प्रकाशाची ज्योत पेटत आहे.

ठळक मुद्देबेळगाव येथे राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार प्रदानपैशाला हात लावायला सरकारला कोणी रोखलं आहे काय?

आजरा : फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. आजच्या अंधारमय काळात प्रकाशाची ज्योत पेटत आहे. त्यामुळे पुरोगाम्यांनी खचून न जाता नव्या पिढीमध्ये विचारांची पेरणी केल्यास पुरोगामी विचारांचा जागर पुन्हा उभारी घेऊ शकतो, असा विश्वास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केला.

बेळगाव येथील ज्योती महाविद्यालयात बाबा आढाव यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कम्युनिष्ट नेते कॉ. कृष्णा मेणसे यांच्या हस्ते राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आढाव म्हणाले, समाजातील मोठा वर्ग आजही अंधश्रद्धेत हरवला आहे. अंधश्रद्धा दूर करायची असेल तर विज्ञानवादी संस्कारक्षम पिढी निर्माण होण्याची गरज आहे. जोपर्यंत तरुण पिढीशी संवाद होत नाही. तोपर्यंत विचारांचा आबोला राहणार आहे. सत्यशोधक चळवळ अनेकांनी पुढे नेली ती आताच का थबकली याचा विचार करण्याची गरज आहे.

नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे कष्टकरांची उपासमार झाली. आज देशातील ५० कोटी जनता असुरक्षित, अस्वस्थ आणि असंघटित आहे. असे असताना देशातील मंदिरातील सोने, पैशाला हात लावायला सरकारला कोणी रोखलं आहे काय? असा सवाल करून हमीभावाचा मूळ प्रश्न सोडविला जात नाही तोपर्यंत आत्महत्या होणारच असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, राष्ट्रवीरकार देसाई यांनी निर्भिड पत्रकारिता केली. राष्ट्रवीरकारांनी अज्ञान, अंधश्रद्धेवर, धार्मिक गुलामगिरीविरुद्ध लेखणी व कृतीतून घणाघात केला. त्यांचे अप्रकाशित असलेले लेख ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित करणार आहेत. यावेळी प्राचार्य आनंद मेणसे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, प्रकाश मरगाळे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर, शिवाजी देसाई, प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, कॉ. संपत देसाई, प्रा. डॉ. प्रकाश पवार, एम. डी. कांबळे यांसह बेळगाव, आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. राजाभाऊ पाटील यांनी स्वागत केले. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विक्रम पाटील यांनी आभार मानले.बेळगावात लक्ष्मी यात्रा बंदसत्यशोधक चळवळ मोठ्या प्रमाणात रुजविलेल्या बेळगावमध्ये १९३६ पासून लक्ष्मी यात्रा होत नाही. यात्रा, मंदिरापेक्षा शिक्षणावर खर्च झाला पाहिजे, असेही मेणसे यांनी यावेळी सांगितले.‘शाहू महाराजांची माया वेगळी’

आढाव यांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर महाराजांसोबत असणाºया वृद्ध धनगराला आपण भेटल्याचे सांगितले. त्यावेळी धनगराला राजा गेल्यामुळे आता तुम्हीच राजे झाला असा मिश्किलपणे सवाल केला. त्यावर तो धनगर म्हणाला, ‘आम्ही राजे झालो खरं, पण शाहू राजांची माया आगळीच होती’, असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.