शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

संस्था विलीनीकरण केले तरच व्यावसायिकता शक्य

By admin | Updated: January 4, 2017 00:27 IST

एका गावात एकच सक्षम संस्था गरजेची : सरकारने केवळ आवाहन न करता मदत करावी

राजाराम लोंढे - कोल्हापूर --राजकीय गणितांसाठी एका-एका गावात तीन-चार विकास संस्था असल्याने त्यातील एकही धड नाही. विकास संस्थांनी व्यावसायिकतेकडे जायचे झाल्यास पहिल्यांदा या संस्थांचे विलीनीकरण करून एका गावात एकच संस्था होणे गरजेचे आहे. विकास संस्थांची आर्थिक स्थिती व व्यवसायासाठी लागणारे अपेक्षित भांडवल पाहता सरकारने केवळ आवाहन करून चालणार नाही, भांडवलासाठी प्रोत्साहनपर मदत करावी, अशी मागणी पुढे येत आहे.विकास संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, हे मान्य असले तरी येथे राजकीय अड्डे झाल्याने हा कणा मोडकळीस आला आहे. दोन हजार लोकसंख्येच्या गावात दोन-तीन विकास संस्था असल्याने सर्वच संस्था आर्थिकदृष्ट्या अकार्यक्षम बनल्या आहेत. व्यवसायाभिमुख बनल्याशिवाय संस्था सक्षम होणार नाहीत, त्यात कोणाचेच दुमत नाही; पण गावपातळीवर आता असा कोणता व्यवसाय राहिला की जो संस्थांनी सुरू करावा आणि त्यातून चार पैसे उत्पन्न मिळावे. स्वस्त धान्य दुकान सरकारने बचतगटांना चालविण्यास दिले आहेत. दळप-कांडप व्यवसाय गल्लोगल्ली आहेत. कापड दुकाने तर ठेचाला झाल्याने संस्थांनी नेमका व्यवसाय काय करावा, याबाबत संस्था पातळीवरच संभ्रम आहे. धाडसाने एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यासाठी भांडवल कसे उपलब्ध करायचे? व्यावसायिक स्पर्धेत टिकायचे झाल्यास खासगी व्यावसायिकांचे मोठे आव्हान संस्थांसमोर राहणार आहे. ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, ते या स्पर्धेत टिकूही शकतील; पण कमकुवत संस्था पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता अधिक आहे. विकास संस्था सक्षम करायच्या झाल्यास पहिल्यांदा गल्लोगल्ली झालेल्या संस्थांचे विलीनीकरण करून एकच सक्षम संस्था कार्यरत झाली पाहिजे. त्यासाठी राजकीय मानसिकताही तितकीच महत्त्वाची आहे. सरकारने आता नवीन विकास संस्थांना परवानगी देताना पाच लाख भागभांडवल, किमान पाचशे सभासद व एक वर्षाच्या आत व्यवसाय सुरू करणे बंधनकारक केले आहे. नोंदणी झाल्यानंतर संस्थांनी हे निकष पाळले नाहीत, तर सहकार विभाग संस्थेची कधीही नोंदणी रद्द करू शकते, असे नवीन धोरण सहकार खात्याच्या विचाराधीन आहे. (उत्तरार्थ) कऱ्हाडच्या संघाचा आदर्शकऱ्हाड खरेदी-विक्री संघाने हंगामी व्यवसाय सुरू केले आहेत. येथे फटाके विक्रीपासून शेती अवजारांची विक्री केली जाते. आपल्याकडे श्रीराम विकास संस्था, कसबा बावड्याच्या पेट्रोलपंपासह विविध विभाग कार्यरत आहेत. काही सक्षम संस्थांना हा प्रयोग पेलेलही; पण सरसकट सर्वांनी व्यवसाय करणे अशक्य आहे. विकास संस्थांची आर्थिक स्थिती पाहता सगळ्यांकडूनच हा प्रयोग यशस्वी होणार नाही; पण सक्षम संस्थांनी खत विक्रीत न अडकता इतर व्यवसायांत उतरले पाहिजे. - मोेहन सालपे,माजी अध्यक्ष, श्रीराम विकास संस्था, कसबा बावडा