शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:12 IST

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अतिरिक्त होणाऱ्या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिरिक्त होणाऱ्या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे आता ज्वारी, बाजरी, मका, वाया जाणारी फळे आणि भाजीपाला यांपासूनही इथेनॉल निर्र्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.१ डिसेंबर २०१८ पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.२०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे. आतापर्यत केवळ उसापासून इथेनॉल निर्मिती करण्याला देशात परवानगी होती. मात्र, इथेनॉलची कमतरता लक्षात घेता हे लक्ष्य पूर्ण होणे कठीण वाटते.एक आॅक्टोबरपर्यंत पेट्रोलमध्ये केवळ ४.२ टक्के मिसळले जाईल इतकेच देशात इथेनॉलचे उत्पादन आहे. यामुळेच जैवइंधन २०१८ चे राष्टÑीय धोरण ठरविण्याचे अधिकार असलेल्या राष्टÑीय जैवइंधन समन्वय समितीच्या बैठकीत अतिरिक्त अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीला मान्यता देण्यात आली. समितीच्या१४ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत अन्नधान्यापासून तयार होणाºया इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आली होती.त्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत १ डिसेंबर २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कृषी वर्षात अतिरिक्त उत्पादन होणाºया मका, ज्वारी, बाजरीपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला ज्या कृषी वर्षात अन्नधान्याचे उत्पादन अतिरिक्त होईल, असे वाटले, तर त्या वर्षात या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.उत्पादन अतिरिक्त आहे का ?या निर्णयामुळे अतिरिक्त होणाºया उत्पादनापासून शेतकºयांना उत्पन्न, तर मिळेलच शिवाय पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी अतिरिक्त इथेनॉल उपलब्ध होणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, देशातील काही भागातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या पिकांचे यंदा अतिरिक्त उत्पादन होणार का? होणार नसेल आणि ही धान्ये इथेनॉल निर्मितीकडे वळविली, तर त्यांची टंचाई निर्माण होऊन दर वाढणार नाहीत का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी अतिरिक्त अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचे सरकारचे धोरण चांगले आहे. मात्र, ते अल्पकालीन न राहता दीर्घकालीन असावे. कारण कोणत्याही निर्णयाचे परिणाम दिसायला तीन-चार वर्षे लागतात. ब्राझीलसारख्या देशात पेट्रोलमध्ये २२ टक्के इथेनॉल मिसळले जाते. शिवाय तिथे इथेनॉलवर चालणारी वाहनेही आहेत. त्यादृष्टीने विचार करता आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. सध्या तेलाच्या लॉबीभोवतीच जागतिक राजकारण फिरते आहे. या निर्णयामुळे आपली पेट्रोलची आयातही थोडीफार कमी होऊन महत्त्वपूर्ण असे परकीय चलनही वाचेल.विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ, कोल्हापूर.