शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:12 IST

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अतिरिक्त होणाऱ्या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अतिरिक्त होणाऱ्या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे आता ज्वारी, बाजरी, मका, वाया जाणारी फळे आणि भाजीपाला यांपासूनही इथेनॉल निर्र्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.१ डिसेंबर २०१८ पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.२०२२ पर्यंत पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे. आतापर्यत केवळ उसापासून इथेनॉल निर्मिती करण्याला देशात परवानगी होती. मात्र, इथेनॉलची कमतरता लक्षात घेता हे लक्ष्य पूर्ण होणे कठीण वाटते.एक आॅक्टोबरपर्यंत पेट्रोलमध्ये केवळ ४.२ टक्के मिसळले जाईल इतकेच देशात इथेनॉलचे उत्पादन आहे. यामुळेच जैवइंधन २०१८ चे राष्टÑीय धोरण ठरविण्याचे अधिकार असलेल्या राष्टÑीय जैवइंधन समन्वय समितीच्या बैठकीत अतिरिक्त अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मितीला मान्यता देण्यात आली. समितीच्या१४ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत अन्नधान्यापासून तयार होणाºया इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आली होती.त्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत १ डिसेंबर २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१९ या कृषी वर्षात अतिरिक्त उत्पादन होणाºया मका, ज्वारी, बाजरीपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाला ज्या कृषी वर्षात अन्नधान्याचे उत्पादन अतिरिक्त होईल, असे वाटले, तर त्या वर्षात या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.उत्पादन अतिरिक्त आहे का ?या निर्णयामुळे अतिरिक्त होणाºया उत्पादनापासून शेतकºयांना उत्पन्न, तर मिळेलच शिवाय पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी अतिरिक्त इथेनॉल उपलब्ध होणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, देशातील काही भागातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता या पिकांचे यंदा अतिरिक्त उत्पादन होणार का? होणार नसेल आणि ही धान्ये इथेनॉल निर्मितीकडे वळविली, तर त्यांची टंचाई निर्माण होऊन दर वाढणार नाहीत का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. 

पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी अतिरिक्त अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याचे सरकारचे धोरण चांगले आहे. मात्र, ते अल्पकालीन न राहता दीर्घकालीन असावे. कारण कोणत्याही निर्णयाचे परिणाम दिसायला तीन-चार वर्षे लागतात. ब्राझीलसारख्या देशात पेट्रोलमध्ये २२ टक्के इथेनॉल मिसळले जाते. शिवाय तिथे इथेनॉलवर चालणारी वाहनेही आहेत. त्यादृष्टीने विचार करता आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. सध्या तेलाच्या लॉबीभोवतीच जागतिक राजकारण फिरते आहे. या निर्णयामुळे आपली पेट्रोलची आयातही थोडीफार कमी होऊन महत्त्वपूर्ण असे परकीय चलनही वाचेल.विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ, कोल्हापूर.