शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

आजरा-चंदगडमधील काजूगरांचे उत्पादन ठप्प

By admin | Updated: April 25, 2016 00:54 IST

उत्पादन घटले : बियांचा दर भडकल्याने ४०० कारखाने बंद

कृष्णा सावंत --पेरणोली -आजरा व चंदगड तालुक्यांसाठी तरुण बेरोजगारांना संजीवनी देणारा काजू प्रक्रिया उद्योग सध्या संकटात सापडला असून, काजू उत्पादन घटल्याने दोन्ही तालुक्यांतील सुमारे ४०० पेक्षा अधिक कारखान्यांतील काजूगरांचे उत्पादन ठप्प झाले आहे.हंगामाच्या सुरुवातीस झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने बियांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे वाटत होते. मात्र, अचानक सातत्याने दव पडू लागल्याने यावर्षी काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत १३० वरून १५० पर्यंत बियांचा दर भडकल्याने चंदगड व आजरा तालुक्यांतील लहान-मोठ्या ४०० पेक्षा अधिक कारखानदारांनी कारखाने बंद केले आहेत. आजरा व चंदगड काजू उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. काजूगरांच्या गुणवत्तेची प्रत चांगली असल्याने दोन्ही तालुक्यांतील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना, तसेच महिलांना रोजगार निर्मितीचे हक्काचे साधन बनले आहे. दरवर्षी किरकोळ स्वरूपात चढ-उतार असला तरी कारखाने टिकून आहेत. मात्र, यावर्षी बियांच्या दराच्या प्रमाणात काजूगरांना दर मिळत नसल्याने कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांच्याही रोजगारावर परिणाम झाला आहे.दरम्यान, उत्पादन घटल्याने गरीब व छोटे शेतकरी अडचणीत सापडले आहेत; तर मोठ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.काजू उत्पादन घटीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचीही घसरण झाली आहे. त्यामुळे गरांच्या किमतीत अपेक्षित वाढ झालेली नाही. या दोन्ही कारणांमुळे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.- बाळू जोशी, काजू उद्योजक, आजरा