शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आजरा-चंदगडमधील काजूगरांचे उत्पादन ठप्प

By admin | Updated: April 25, 2016 00:54 IST

उत्पादन घटले : बियांचा दर भडकल्याने ४०० कारखाने बंद

कृष्णा सावंत --पेरणोली -आजरा व चंदगड तालुक्यांसाठी तरुण बेरोजगारांना संजीवनी देणारा काजू प्रक्रिया उद्योग सध्या संकटात सापडला असून, काजू उत्पादन घटल्याने दोन्ही तालुक्यांतील सुमारे ४०० पेक्षा अधिक कारखान्यांतील काजूगरांचे उत्पादन ठप्प झाले आहे.हंगामाच्या सुरुवातीस झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने बियांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे वाटत होते. मात्र, अचानक सातत्याने दव पडू लागल्याने यावर्षी काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत १३० वरून १५० पर्यंत बियांचा दर भडकल्याने चंदगड व आजरा तालुक्यांतील लहान-मोठ्या ४०० पेक्षा अधिक कारखानदारांनी कारखाने बंद केले आहेत. आजरा व चंदगड काजू उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. काजूगरांच्या गुणवत्तेची प्रत चांगली असल्याने दोन्ही तालुक्यांतील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना, तसेच महिलांना रोजगार निर्मितीचे हक्काचे साधन बनले आहे. दरवर्षी किरकोळ स्वरूपात चढ-उतार असला तरी कारखाने टिकून आहेत. मात्र, यावर्षी बियांच्या दराच्या प्रमाणात काजूगरांना दर मिळत नसल्याने कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांच्याही रोजगारावर परिणाम झाला आहे.दरम्यान, उत्पादन घटल्याने गरीब व छोटे शेतकरी अडचणीत सापडले आहेत; तर मोठ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.काजू उत्पादन घटीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचीही घसरण झाली आहे. त्यामुळे गरांच्या किमतीत अपेक्षित वाढ झालेली नाही. या दोन्ही कारणांमुळे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.- बाळू जोशी, काजू उद्योजक, आजरा