शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

आजरा-चंदगडमधील काजूगरांचे उत्पादन ठप्प

By admin | Updated: April 25, 2016 00:54 IST

उत्पादन घटले : बियांचा दर भडकल्याने ४०० कारखाने बंद

कृष्णा सावंत --पेरणोली -आजरा व चंदगड तालुक्यांसाठी तरुण बेरोजगारांना संजीवनी देणारा काजू प्रक्रिया उद्योग सध्या संकटात सापडला असून, काजू उत्पादन घटल्याने दोन्ही तालुक्यांतील सुमारे ४०० पेक्षा अधिक कारखान्यांतील काजूगरांचे उत्पादन ठप्प झाले आहे.हंगामाच्या सुरुवातीस झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने बियांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे वाटत होते. मात्र, अचानक सातत्याने दव पडू लागल्याने यावर्षी काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत १३० वरून १५० पर्यंत बियांचा दर भडकल्याने चंदगड व आजरा तालुक्यांतील लहान-मोठ्या ४०० पेक्षा अधिक कारखानदारांनी कारखाने बंद केले आहेत. आजरा व चंदगड काजू उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. काजूगरांच्या गुणवत्तेची प्रत चांगली असल्याने दोन्ही तालुक्यांतील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना, तसेच महिलांना रोजगार निर्मितीचे हक्काचे साधन बनले आहे. दरवर्षी किरकोळ स्वरूपात चढ-उतार असला तरी कारखाने टिकून आहेत. मात्र, यावर्षी बियांच्या दराच्या प्रमाणात काजूगरांना दर मिळत नसल्याने कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांच्याही रोजगारावर परिणाम झाला आहे.दरम्यान, उत्पादन घटल्याने गरीब व छोटे शेतकरी अडचणीत सापडले आहेत; तर मोठ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.काजू उत्पादन घटीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचीही घसरण झाली आहे. त्यामुळे गरांच्या किमतीत अपेक्षित वाढ झालेली नाही. या दोन्ही कारणांमुळे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.- बाळू जोशी, काजू उद्योजक, आजरा