शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आजरा-चंदगडमधील काजूगरांचे उत्पादन ठप्प

By admin | Updated: April 25, 2016 00:54 IST

उत्पादन घटले : बियांचा दर भडकल्याने ४०० कारखाने बंद

कृष्णा सावंत --पेरणोली -आजरा व चंदगड तालुक्यांसाठी तरुण बेरोजगारांना संजीवनी देणारा काजू प्रक्रिया उद्योग सध्या संकटात सापडला असून, काजू उत्पादन घटल्याने दोन्ही तालुक्यांतील सुमारे ४०० पेक्षा अधिक कारखान्यांतील काजूगरांचे उत्पादन ठप्प झाले आहे.हंगामाच्या सुरुवातीस झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर आल्याने बियांच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचे वाटत होते. मात्र, अचानक सातत्याने दव पडू लागल्याने यावर्षी काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत १३० वरून १५० पर्यंत बियांचा दर भडकल्याने चंदगड व आजरा तालुक्यांतील लहान-मोठ्या ४०० पेक्षा अधिक कारखानदारांनी कारखाने बंद केले आहेत. आजरा व चंदगड काजू उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. काजूगरांच्या गुणवत्तेची प्रत चांगली असल्याने दोन्ही तालुक्यांतील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना, तसेच महिलांना रोजगार निर्मितीचे हक्काचे साधन बनले आहे. दरवर्षी किरकोळ स्वरूपात चढ-उतार असला तरी कारखाने टिकून आहेत. मात्र, यावर्षी बियांच्या दराच्या प्रमाणात काजूगरांना दर मिळत नसल्याने कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिलांच्याही रोजगारावर परिणाम झाला आहे.दरम्यान, उत्पादन घटल्याने गरीब व छोटे शेतकरी अडचणीत सापडले आहेत; तर मोठ्या शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.काजू उत्पादन घटीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचीही घसरण झाली आहे. त्यामुळे गरांच्या किमतीत अपेक्षित वाढ झालेली नाही. या दोन्ही कारणांमुळे कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे.- बाळू जोशी, काजू उद्योजक, आजरा