शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राज्यात ४१ लाख टन साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 23:29 IST

चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे ...

चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप झाले असून ४१ लाख १६ हजार ४८ टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात पुणे विभाग तर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.राज्यात २० आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू झाला असला तरी दिवाळीनंतरच त्याने गती घेतली. राज्यातील सहकारी ९९ आणि खासगी ८६ अशा १८५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ७ लाख ६६८० टन इतकी आहे. राज्यातील ७ विभागांपैकी पुणे विभागात सर्वाधिक ६२ कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांनी १६९ लाख २५ हजार क्विंटल उसाचे गाळप करून १७ लाख ३८८ हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा १०.२७ टक्के आहे. त्याखालोखाल कोल्हापूर विभागात ३६ कारखाने सुरू असून त्यांनी ८३ लाख ४० हजार टन उसाचे गाळप करुन ९ लाख ५८१ टन साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा ११.४९ टक्के इतका तर राज्याचा साखर उतारा १०.४४ टक्के इतका आहे. २८ डिसेंबरअखेरचे हे आकडे आहेत.राज्यात या हंगामात १०७.२३ लाख टन साखर उत्पादन होईल, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, दुष्काळ आणि हुमणीचा प्रार्दुभाव यामुळे उत्पादनात घट येऊन ९५ लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.कोल्हापूर विभागात ऊस बिलांचा तिढागाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले तरी कोल्हापूर विभागात शेतकºयांच्या हाती अद्याप ऊस बिले पडलेली नाहीत. एफआरपी एकरकमी देण्याला कारखान्यांनी असमर्थता व्यक्त करून सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीच मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.यासंदर्भात कोल्हापुरातील साखर कारखानदारांची ५ जानेवारीला बैठक होणार असून त्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात अन्यत्र मात्र एफआरपीचे तुकडे पाडून काही कारखान्यांनी ८० -२० किंवा ८० -३० अशा स्वरुपात ऊस बिले देणे सुरू केले आहे.विभागनिहाय ऊस गाळप आणि साखर उत्पादनविभाग कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन उतारा (%)कोल्हापूर ३६ ८३.४० ९५.८१ ११.४९पुणे ६२ १६९.२३ १७३.८८ १०.२७अहमदनगर २८ ६१.७ ६३.०१ १०.३२औरंगाबाद २२ ३४.८३ ३३.३७ ९.५८नांदेड ३२ ४७.६५ ४८.०२ १०.०८अमरावती २ १.०४ १.०५ १०.१०नागपूर ३ १.५४ १.३४ ०८.७३एकूण १८५ ३९८.७७ ४१६.४८ १०.४४(ऊस गाळप लाख मे. टन तर साखर उत्पादन लाख क्विंटलमध्ये )