शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

निर्माते चार हजार, शंभर सेन्सॉर; साठच प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:06 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नोंदणीनुसार मराठी चित्रपटसृष्टीत तब्बल चार हजार ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नोंदणीनुसार मराठी चित्रपटसृष्टीत तब्बल चार हजार निर्माते आहेत. प्रत्यक्षात मात्र वर्षाकाठी १00 ते १२५ चित्रपट सेन्सॉर होतात, त्यापैकी ५० ते ६० चित्रपट प्रदर्शित होऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीची जोमाने घोडदौड सुरू आहे, तर दुसरीकडे नामधारी निर्मात्यांचीच यादी मोठी आहे.मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाचे डिजिटायझेशन सुरू असून, महामंडळाकडे चार हजार निर्मात्यांची नोंद आहे; पण निर्मात्यांची संख्या आणि सेन्सॉर होऊन प्रत्यक्ष रसिकांपर्यंत पोहोचणाऱ्या चित्रपटांची संख्या यामध्ये जमीनअस्मानची तफावत आहे. महामंडळाच्या नियमानुसार निर्माता म्हणून नोंद झाली, की एक वर्षाच्या आत त्यांनी चित्रपट काढणे बंधनकारक आहे. तसेच न झाल्यास पुढे दोन वर्षांसाठी असे एकूण तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिली जाते; पण त्यानंतरही चित्रपट प्रदर्शित झाला नाही, तर व्यक्तीचे नाव निर्मात्याच्या यादीतून काढले जाते. मात्र, नोंदणीनंतर एक चित्रपट काढला, तरी नावापुढे निर्माता म्हणून कायमचा शिक्का लागतो. अशा एक-दोन चित्रपटांवरच थांबलेल्या निर्मात्यांची संख्या मोठी आहे. अनेक निर्माते गेली कित्येक वर्षे चित्रपट निर्मिती करीतच नाहीत, तरीही त्यांची नोंदणी कायम राहते; त्यामुळे निर्मात्यांचा आकडा फुगलेला दिसतो.मराठी चित्रपटसृष्टीतही आता १00 कोटींची उड्डाणे होऊ लागली आहेत. दुसरीकडे आशयपूर्ण मांडणी, दर्जेदार सादरीकरणाने कमी बजेटचे चित्रपटही प्रेक्षकांची गर्दी खेचत आहेत; पण अशा सर्जनशील निर्माते आणि दिग्दर्शकांची नावे अगदी बोटावर मोजण्यासारखी आहेत.आर्थिक गणित : ‘सैराट’नंतर तीन वर्षांत ग्रामीण भागातील निर्मात्यांची नावनोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे. चित्रपट निर्मितीकडे सातत्य व उत्तम दर्जा या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे; पण तसे होत नाही. केवळ चित्रीकरण करणे म्हणजे निर्माते झालो, असे होत नाही, तर पोस्ट प्रॉडक्शन व चित्रपट प्रदर्शित करण्यापर्यंतची प्रक्रिया ही किचकट व तितकीच खर्चिक असते. व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव आणि आर्थिक गणिताचा मेळ न बसल्याने अनेक निर्माते डबघाईत गेले आहेत. काही चित्रपट तयार होतात; पण प्रदर्शनच न झाल्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत.अनुदान पदरात पाडून घेण्यासाठीच खटाटोप...मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाकडून ४० लाखांचे अनुदान दिले जाते. पूर्वी हे अनुदान दुसºया चित्रपटासाठी लागू होते. आता पहिल्याच चित्रपटाला दिले जात असल्याने अनुदानाच्या आमिषाने कमी बजेटमध्ये एक चित्रपट काढून अनुदान पदरात पाडून घ्यायचे, अशी मानसिकता असते. मात्र, या आमिषाने अनेकजण फसले आहेत; कारण त्यांना सेन्सॉरची मान्यता मिळालेली नाही. हे निर्माते नंतर महामंडळाकडे कैफियत घेऊन जातात; पण चित्रपटच इतका सुमार असतो, की महामंडळही काही करू शकत नाही.