शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

सलग सभांअभावी निधीची अडचण

By admin | Updated: March 7, 2016 00:15 IST

असिफ मोकाशी : पन्हाळा नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाचा फटका

पन्हाळा : पन्हाळा नगरपरिषदेच्या सलग चार सर्वसाधारण व विशेष सभा झाल्या नसल्याने शासनाकडून येणारा निधी चालू वर्षी येणार नसल्याने पन्हाळा शहराच्या विकासाची कामे थांबली असल्याचे नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.नगराध्यक्ष जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत असहकार असा पवित्रा घेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ११ नगरसेवकांनी ११ नोव्हेंबरची सर्वसाधारण सभा, १६ आॅक्टोबरची विशेष सभा, तसेच २७ आॅक्टोबर आणि २५ फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभांवर बहिष्कार घातला होता. यामुळे पन्हाळा शहर विकासाचे ५० विषय निधीअभावी थांबणार आहेत. २५ फेब्रुवारीला अंदाजपत्रकाची सर्वसाधारण सभा बोलावली होती. नगरपरिषदेच्या स्थापनेपासून प्रथमच स्थायी समिती सभेच्या मंजुरीशिवाय अंदाजपत्रक या सभेत मांडले गेले. केवळ तीन मिनिटांत मागील सभेचे प्रोसिडिंग सरकारी टपाल व अंदाजपत्रक असे मंजूर करून सभा तहकूब ठेवली.जनसुराज्य शक्ती पक्षाच्या ११ नगरसेवकांनी ७१ विषयांची सभा घेण्याबाबत नगराध्यक्षांकडे मागणी केली आहे. जरी हे विषय किंवा तहकूब झालेल्या सभेचे विषय मंजूर झाले तरी शासनाकडे जानेवारी अखेरपर्यंत निधीची मागणी करता येते. त्यामुळे यापुढे जरी सभा झाल्या व विषयही मंजूर झाले तरी निधी नसल्याने मार्च २०१७ पर्यंत कोणतीही कामे करता येणार नाहीत.नगरपरिषदेकडे येणारे प्रवासी कराचे उत्पन्न व घरफाळा यातून कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शन भागविले जातील. यातच आॅक्टोबर महिन्यात नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याने त्यासाठी निधी राखून ठेवावा लागणार आहे. नगराध्यक्ष असिफ मोकाशी म्हणाले, मागील चार सभांत जे विषय घेतले होते, त्यातीलच फोड करून ७१ विषय घेऊन सभेची मागणी या नगरसेवकांनी केली आहे. शहराचा पाण्याचा विषय, अग्निशामक गाडी घेणे, खराब रस्त्यांचा विषय, सीसीटीव्ही, आदी विषय गंभीरतेने घेतल्याने आमदार सत्यजित पाटील, अमल महाडिक, सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पन्हाळागडाला निधी द्यावयास तयार आहेत; पण सभाच होत नसल्याने व ते विषय मंजूर होत नसल्याने या सर्वांकडे निधी मागता येत नाही. (प्रतिनिधी)परिणाम : शहरातील रखडणारी कामेमार्च २०१७ अखेर निधीअभावी रखडणारे विषय - शिवस्मारकाचे बांधकाम, नगरोत्थान योजना, पर्यटन विकास योजना, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, अग्निशामक गाडी, पिण्याचा पाण्याचा प्रश्न.सभेचे विषय मंजूर झाले तरी शासनाकडे जानेवारी अखेरपर्यंत निधीची मागणी करता येते. त्यामुळे यापुढे जरी सभा झाल्या व विषयही मंजूर झाले तरी निधी नसल्याने मार्च २०१७ पर्यंत कामे करता येणार नाहीत.