शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

कचऱ्याच्या जागेचा प्रश्न खोळंबला

By admin | Updated: May 10, 2017 00:26 IST

शहरातील कचरा प्रश्न गंभीर : जयसिंगपूर पालिकेकडे जागेचे नऊ प्रस्ताव

संदीप बावचे ।  --लोकमत न्यूज नेटवर्क --जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जागेशिवाय पर्याय नाही. जागा खरेदी करणे आणि त्याठिकाणी कचरा टाकणे हाच प्रश्न पालिकेसमोर असला तरी पालिकेने निविदा काढून प्रस्ताव मागविले होते. यामध्ये तब्बल नऊ जागेचे प्रस्ताव आले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत जमीन भाडेतत्वावर घेणे अथवा खरेदी करणे हा विषय सभेत तहकूब करण्यात आला होता. त्यामुळे सध्या नवीन जागेचा प्रश्न पुन्हा खोळंबला आहे. १ जानेवारी २०१७ पासून चिपरी हद्दीतील खाणीत कचरा टाकण्यास विरोध झाल्याने गेल्या चार महिन्यांपासून खामकर मळ्यातील जुन्या विहिरीत कचरा टाकला जात होता. पालिका प्रशासनाकडून कचरा टाकण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून कचराकुंड्या हाऊसफुल्ल झाल्यामुळे कचरा प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले होते. कचराकुंड्या भरून वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. कचऱ्याचे साचलेले ढीग त्यावर तुटून पडलेली डुकरे व गाढवे हे चित्र शहरात दिसत होते. दररोज संकलित होणारा सुमारे १६ टन कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न पालिकेसमोर पुन्हा आ वासून उभा राहिला आहे. दरम्यान, खामकर मळ्यातच पुन्हा हा कचरा टाकला जात असला तरी हा तात्पुरताच पर्याय आहे. सांगली महापालिकेच्या कचरा डेपोत कचरा टाकण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. कचऱ्याप्रश्नी प्रशासनच टार्गेट होत आहे. दरम्यान, ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सपाटीकरण जमिनीचा शोध पालिकेकडून घेतला जात आहे. शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जमिनीची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर अशी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी, मिळकतधारकांनी कागदपत्रासह पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन निविदेद्वारे करण्यात आले होते. तब्बल नऊ जमीनमालकांचे प्रस्ताव पालिकेकडे आले आहेत. यातील बहुतांशी जमिनी काळ्या मातीतील असल्यामुळे त्या जमिनी उपयोगाच्या ठरणार नाहीत. उर्वरित जमिनीबाबत सभेत ठराव करणे गरजेचे आहे. सभेत विषय तहकूब२९ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरात संकलित होणारा ओला व सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणे, भूभरावासाठी जमीन भाड्याने घेणे किंवा खरेदी करणे असा विषय होता. चौदाव्या वित्त आयोगातून हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी गरजेची असल्यामुळे हा विषय सभागृहात मंजूर करून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार होता. मात्र, सभेतच हा विषय तहकूब करण्यात आल्यामुळे जागेचा प्रश्न पुन्हा प्रलंबित पडला आहे. ‘ताराराणी’चे शाहू आघाडीला साकडे१ शहरात गंभीर बनलेला कचरा प्रश्न चांगलाच गाजत आहे. त्यामुळे ताराराणी आघाडी व शाहू आघाडीने पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. २ २९ एप्रिलला झालेल्या सभेत ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद बजरंग खामकर यांनी शाहू आघाडी व उपनगराध्यक्ष संजय पाटील -यड्रावकर यांनी पुढाकार घेतला तर कचऱ्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लागेल, अशी स्पष्टोक्ती दिली होती. ३ कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी समन्वयातून मार्ग काढावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.