शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

खासगी विहिरी, कूपनलिकांवरही आता उपसाबंदी

By admin | Updated: April 18, 2016 01:07 IST

पाटबंधारे विभागाचा फतवा : प्रशासन विरुद्ध शेतकरी संघर्ष उफाळणार; उपसाबंदी लादण्याबाबत नाराजी

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर --पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावे म्हणून आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा फतवा काढला आहे. स्वत:च्या पैशाने खोदलेल्या विहिरी आणि कूपनलिकांवर उपासाबंदी लादण्याचा प्रशासनास काय अधिकार आहे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावर प्रशासन व संबंधित शेतकऱ्यांत आगामी काळात संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाने पिण्यासाठी पहिल्यांदा आरक्षित केले आहे. उर्वरित पाणी शेती, उद्योगासाठी वापरण्याला मुबा दिली आहे. नोव्हेंबर २०१५ पासून नदी, तलाव यांच्यावर उपसाबंदी करून पाणी वापरावर निर्बंध आणले जात आहे. उपसाबंदी पाटबंधारे विभागातर्फे जाहीर केली जाते. अंमलबजावणी वीज वितरण कंपनी करते. उपसाबंदीच्या कालावधीत थ्रीफेज वीज कनेक्शन पूर्णपणे बंद ठेवणे आणि आकडे टाकून चोरून वीज घेऊन पाणी उपसा करू नये यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वीज प्रशासनाची आहे. परंतु, प्रत्यक्षात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी वीज प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणा नाही. सर्वच ठिकाणी थ्रीफेज व सिंगल फेज अशी वीज वितरणाची स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे उपसाबंदी करणे अडचणीचे होत आहे. अनेक ठिकाणी उपसाबंदी नसतानाच्या कालावधीत नियमित वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे उपसा बंदी करा, असे सांगण्यास गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास पहिल्यांदा वीज सुरळीत द्या, असे शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावे लागत आहे, असे एका बाजूला चित्र आहे. दुसऱ्या बाजूला उपसा बंदीची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास पिण्यासाठी आरक्षित पाण्यावर घाला येणार आहे. पाण्याचे नियोजन कोलमडणार आहे. यामुळेच उपसाबंदीच्या कालावधीत आकडे टाकून विद्युतपंपाद्वारे पाणी उपसणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाणी टंचाई निवारण बैठकीत दिली. बैठकीतील सूचनेचा आधार घेत ‘पाटबंधारे’च्या प्रशासनाने खासगी कूपनलिका, विहिरी यांच्यावरही उपासाबंदी केली आहे. काही शेतकरी उपसाबंदी नसलेल्या कालावधीत खासगी विहिरीत पाणी टाकत आहेत. या कालावधीत विहिरीतील ते पाणी उपसतात, अशा तक्रारी आहेत. उपसाबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारेफायद्यापेक्षा नुकसानच..शेतकऱ्यांच्या खासगी कूपनलिका व विहिरींतील पाणी उपसाबंदीच्या वेळचे शिल्लक राहिलेले पाणी काय करणार, हे प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. नदी, तलाव यावरील लागू करण्यात आलेल्या उपासाबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा सरसकट निर्णय घेतल्याचे ‘पाटबंधारे, वीज वितरण’च्या प्रशासनाचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे फायदा तर कोणाचा नाहीच, उलट विहीर, कूपनलिकेवर अवलंबून असलेली पिके वाळल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.कोठे आहे उपसाबंदी?चिकोत्रा, चित्री, भोगावती, पंचगंगा, कासारी या खोऱ्यांसह २१ लघु पाटबंधारे प्रकल्पांवर उपसाबंदी सुरू आहे. ज्या तलावावर उन्हाळी पिके आहेत, त्या उर्वरित १४ लघु पाटबंधारे तलावावरही उपसाबंदी करण्यात येणार आहे.