शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

खासगी विहिरी, कूपनलिकांवरही आता उपसाबंदी

By admin | Updated: April 18, 2016 01:07 IST

पाटबंधारे विभागाचा फतवा : प्रशासन विरुद्ध शेतकरी संघर्ष उफाळणार; उपसाबंदी लादण्याबाबत नाराजी

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर --पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावे म्हणून आता नदी, तलावांबरोबरच खासगी विहिरी, कूपनलिकांवरही (बोअरवेल) पाटबंधारे विभागाने उपासाबंदीचा फतवा काढला आहे. स्वत:च्या पैशाने खोदलेल्या विहिरी आणि कूपनलिकांवर उपासाबंदी लादण्याचा प्रशासनास काय अधिकार आहे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावर प्रशासन व संबंधित शेतकऱ्यांत आगामी काळात संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करताना जिल्हा प्रशासनाने पिण्यासाठी पहिल्यांदा आरक्षित केले आहे. उर्वरित पाणी शेती, उद्योगासाठी वापरण्याला मुबा दिली आहे. नोव्हेंबर २०१५ पासून नदी, तलाव यांच्यावर उपसाबंदी करून पाणी वापरावर निर्बंध आणले जात आहे. उपसाबंदी पाटबंधारे विभागातर्फे जाहीर केली जाते. अंमलबजावणी वीज वितरण कंपनी करते. उपसाबंदीच्या कालावधीत थ्रीफेज वीज कनेक्शन पूर्णपणे बंद ठेवणे आणि आकडे टाकून चोरून वीज घेऊन पाणी उपसा करू नये यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी वीज प्रशासनाची आहे. परंतु, प्रत्यक्षात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी वीज प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणा नाही. सर्वच ठिकाणी थ्रीफेज व सिंगल फेज अशी वीज वितरणाची स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे उपसाबंदी करणे अडचणीचे होत आहे. अनेक ठिकाणी उपसाबंदी नसतानाच्या कालावधीत नियमित वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे उपसा बंदी करा, असे सांगण्यास गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास पहिल्यांदा वीज सुरळीत द्या, असे शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावे लागत आहे, असे एका बाजूला चित्र आहे. दुसऱ्या बाजूला उपसा बंदीची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास पिण्यासाठी आरक्षित पाण्यावर घाला येणार आहे. पाण्याचे नियोजन कोलमडणार आहे. यामुळेच उपसाबंदीच्या कालावधीत आकडे टाकून विद्युतपंपाद्वारे पाणी उपसणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाणी टंचाई निवारण बैठकीत दिली. बैठकीतील सूचनेचा आधार घेत ‘पाटबंधारे’च्या प्रशासनाने खासगी कूपनलिका, विहिरी यांच्यावरही उपासाबंदी केली आहे. काही शेतकरी उपसाबंदी नसलेल्या कालावधीत खासगी विहिरीत पाणी टाकत आहेत. या कालावधीत विहिरीतील ते पाणी उपसतात, अशा तक्रारी आहेत. उपसाबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी खासगी विहिरी, कूपनलिका यांच्यावरही उपसाबंदी केली आहे.- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारेफायद्यापेक्षा नुकसानच..शेतकऱ्यांच्या खासगी कूपनलिका व विहिरींतील पाणी उपसाबंदीच्या वेळचे शिल्लक राहिलेले पाणी काय करणार, हे प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. नदी, तलाव यावरील लागू करण्यात आलेल्या उपासाबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा सरसकट निर्णय घेतल्याचे ‘पाटबंधारे, वीज वितरण’च्या प्रशासनाचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे फायदा तर कोणाचा नाहीच, उलट विहीर, कूपनलिकेवर अवलंबून असलेली पिके वाळल्याने शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.कोठे आहे उपसाबंदी?चिकोत्रा, चित्री, भोगावती, पंचगंगा, कासारी या खोऱ्यांसह २१ लघु पाटबंधारे प्रकल्पांवर उपसाबंदी सुरू आहे. ज्या तलावावर उन्हाळी पिके आहेत, त्या उर्वरित १४ लघु पाटबंधारे तलावावरही उपसाबंदी करण्यात येणार आहे.