शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST

गडहिंग्लज : जुलैमधील महापुरामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात मिळून हजारो कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या ...

गडहिंग्लज : जुलैमधील महापुरामुळे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात मिळून हजारो कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाच्या कामालाच आपले प्रथम प्राधान्य राहील, अशी माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

महापुरामुळे निर्माण झालेल्या पुनर्वसनाच्या कामासंदर्भातील अडचणी व दिशा यासंदर्भात त्यांनी विवेचन केले, तसेच आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्नदेखील मार्गी लावण्यावर आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाघमोडे म्हणाले की, पुनर्वसन हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यासंदर्भातील आदेश प्राप्त होताच कार्यवाही सुरू होईल; परंतु त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पूरबाधित कुटुंबांची गावनिहाय माहिती संकलित केली जाईल.

दरम्यान, गावनिहाय बैठका घेऊन पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. अपवाद वगळता बहुतेक पूरबाधित गावात पुनर्वसनासाठी शासकीय जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे खासगी जमिनी मालकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नव्या कायद्यानुसार भू-संपादनाचा मोबदला म्हणून रेडिरेकनरपेक्षा चौपट रक्कम दोन महिन्यात मिळू शकते. यासंदर्भात जनजागृती करून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वेच्छेने जमिनी देण्यासाठी खातेदार तयार व्हावेत, यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

-------------------------

बाबासाहेब वाघमोडे : १९०८२०२१-गड-०६