शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

मरणाऱ्या लोकांचा जीव वाचवण्यास प्राधान्य द्या लोकभावना व्यक्त : लोकमतच्या वृत्ताची समाजाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील मृत्युदर देशात सर्वाधिक आहे या मरणाऱ्या माणसांना वाचवण्याची हाक बुधवारी समाजातून उमटली. लोकमतने मतदारांसाठी जोडण्या..रुग्ण मात्र ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील मृत्युदर देशात सर्वाधिक आहे या मरणाऱ्या माणसांना वाचवण्याची हाक बुधवारी समाजातून उमटली. लोकमतने मतदारांसाठी जोडण्या..रुग्ण मात्र वाऱ्यावर असे अत्यंत सडेतोड वृत्त प्रसिध्द करून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी धावून जात नसल्याचे आसूड ओढले. सर्वसामान्य जनतेचीच भा‌वना लोकमतने मांडल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली.

कोल्हापूरात बारापैकी दहा आमदार व दोन्ही लोक नियुक्त खासदार हे सत्ताधारी महाविकास आघाडीचेच आहेत. त्यामुळे हातातील सत्तेचा वापर आणि मतदार संघातील जनतेसाठी स्वत:च्या हिंमतीवर कोविड सेंटर अथवा तत्सम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या रोज हजाराने वाढत आहे. मृत्यूही होत आहेत. परंतु लोकप्रतिनिधींना त्याचे काहीच सोयरसूतक नाही त्यावर या वृत्तात बोट ठेवण्यात आले.

गेल्यावर्षी कोरोना लाटेत महापालिकेची यंत्रणा अधिक जागरुक होती. एखादा संशयित रुग्ण सापडला की तो भाग तातडीने सील केला जाई. तिथे औषध फवारणीपासून अनेक उपाययोजना केल्या जात होत्या. परंतु यावर्षी अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले. नगरसेवक सध्या सत्तेत नसले तरी स्थानिक नागरिकांना मदत करू शकतात परंतु ते देखील यावेळी फारसे लोकांसाठी काम करताना दिसत नसल्याचे अनुभव काहीनी शेअर केले.

विधानसभा-लोकसभा निवडणुकीत ४५ दिवस सगळे अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हातात एकवटलेले असतात. तसा निवडणूक प्रोटोकॉल लागू करून उपाययोजना केल्या जाव्यात. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनातील नावाजलेले तज्ज्ञ आहेत, त्यांना राजकीय नेत्यांनी मोकळीक देण्याची गरज असल्याचीही प्रतिक्रिया वाचकाने व्यक्त केली.

महिनाभर एकच टार्गेट

जिल्हा प्रशासन असो की लोकप्रतिनिधी या सर्वांचे सध्या फक्त आणि फक्त कोरोना रोखणे हेच टार्गेट हवे. एकमेकांवर राजकीय आरोपप्रत्योराप, उणीदुणी काढण्यापेक्षा सगळी ताकद लोकांना चांगले उपचार कसे मिळतील व त्यांचा जीव कसा वाचेल यावर केंद्रित करायला हवी अशाही भावना काहीनी व्यक्त केल्या.

सोशल मीडियावर धूम..

लोकमतच्या या वृत्ताची बुधवारी दिवसभर प्रचंड चर्चा झाली. सोशल मीडियावर ती सर्वाधिक शेअर झाली. कित्येकांनी ती स्टेटस म्हणूनही लावली. लोकमतकडे दिवसभरातही ५० हून अधिक लोकांनी फोन करून अशाच रोखठोक पत्रकारितेची अपेक्षा व्यक्त केली.