शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
4
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
5
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
6
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
7
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
8
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
9
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
10
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
11
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
12
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
13
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
14
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
15
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
17
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
18
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
19
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
20
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

प्राथमिक शिक्षकांची धावाधाव

By admin | Updated: May 27, 2015 00:59 IST

सोई सवलती देण्याची तयारी : पटसंख्या टिकविण्यासाठी विद्यार्थी शोध सुरू

घन:शाम कुंभार - यड्राव -ग्रामीण भागातील पालकांचा कल खासगी शाळेत मुलांना पाठविण्याकडे असल्याने जिल्हा परिषदांच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या कमी पडत आहे; तर पटाअभावी बदलीची जोखीम शिक्षकांवर आल्याने नव्या विद्यार्थ्यांना स्वखर्चाने सोई सवलती देण्याची तयारी शिक्षकांनी केली असली तरी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेची गुणवैशिष्ट्ये व गुणवत्ता असलेले डिजिटल फलक शाळेच्या भिंतीवर लागले आहेत.खासगी शाळा, तेथील आकर्षक परिसर, गणवेश, घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत असणारी बससेवा, इंग्रजी माध्यमाचे शिक्षण यासह शेजारचा मुलगा अशा शाळेत जातो म्हटल्यावर आपले पाल्य तिथे शिक्षण घ्यावी, ही भावना ग्रामीण भागासह सर्वत्र रूढ होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांसह पालकही याकडे आकर्षिक होत आहेत.याचा परिणाम शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या घटण्यामध्ये होत आहे. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या कमी झाली, तर सध्या ज्या शाळेत शिक्षण देण्याचे काम शिक्षकांकडून होते, तेथील शिक्षक संख्या नियमाप्रमाणे कमी होईल व त्यांना अन्यत्र जावे लागेल.नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास महिनाभर अवधी असला तरी शिक्षकमंडळी सुटीचा आनंद घेण्याऐवजी नवे विद्यार्थी शोधण्याची मोहीम सुरू करून त्यांच्या पालकांना आपल्या शाळांचे महत्त्व व वैशिष्ट्ये पटवून देत आहेत; तर शहर परिसरातील खासगी शाळांसह, जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलकडून आपल्या संस्थेची गुणवत्ता, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, विविध स्पर्धांतील यशस्वीतांचे फोटो व सेवा-सुविधांची माहिती असणारे डिजिटल फलक आपापल्या इमारतींवर झळकवले जात आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांना आकर्षित करण्यासाठी खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मात्र धावाधाव करावी लागत आहे. पटसंख्या टिकविण्यासाठी त्यांना विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत असून, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तयार करण्यासाठी शिक्षकांना परीक्षा द्यावी लागत आहे.विविध सोयींची सवलतशाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढावी, नवे विद्यार्थी आपल्या शाळेकडे कसे आकर्षित होतील, याकरिता शिक्षकांनी संयुक्तपणे स्वजबाबदारीवर विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण, आकर्षक गणवेशासाठी प्रयत्न, बैठकीसाठी बेंचेसची देणगीद्वारे उपलब्धता, जादा अंतरावरील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी वाहनाची सोय, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहनाबरोबरच त्यांच्यावर आर्थिक बोजा पडू नये, याचीही खबरदारी घेतली जात आहे.