शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

दाम अन् दम देऊन घेतल्या बांधकाम परवानग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:29 IST

भारत चव्हाण । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : २००५ सालातील महापुरामुळे शहाणपण घेतलेल्या महानगरपालिका प्रशासनाने पूररेषेतील बांधकामांना परवानगी देण्याचे ...

भारत चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : २००५ सालातील महापुरामुळे शहाणपण घेतलेल्या महानगरपालिका प्रशासनाने पूररेषेतील बांधकामांना परवानगी देण्याचे बंद केले. पुढे दोन वर्षे त्यावर चर्चाच झाली नाही. त्यानंतर मात्र मंत्रालयातून दबाव टाकून पूररेषेच्या आतील बांधकामांना परवानगी देण्यास भाग पाडून काही मूठभरांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. पुढच्या काळात बिल्डर, कारभारी नगरसेवक आणि अधिकारी यांची एक भ्रष्ट साखळीच निर्माण झाली. त्यातून गेल्या दहा-बारा वर्षांत निर्बंधित क्षेत्रात आलिशान बंगले, मोठे गृहप्रकल्प उभे राहिले. त्याचा परिणाम या महिन्यातील महापुराच्या पाण्यात अनेक नागरी वस्त्या बुडण्यात आणि अनेकांचे मोठे नुकसान होण्यात झाला.अधिकाऱ्यांवर मंत्रालयातून दबावसन २००७ ते २०१४ पर्यंत पंचगंगा नदीच्या पूररेषेच्या आत बांधकामांना मोठ्या प्रमाणात परवानगी दिली गेली. त्यासाठी प्रसंगी मंत्रालयातून दबाव टाकला गेला. तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्यानंतर त्यांनी काही बिल्डरांना नोटीस देऊन ‘तुमची बांधकाम परवानगी रद्द का करू नये?’ म्हणून नोटिसा बजावल्या. अटींचे उल्लंघन करताना अनेकांकडून १५ ते २० फूट उंचीचे मुरमाचे भराव टाकण्यात आले. म्हणून या नोटिसा बजावल्या. त्यावेळीही अधिकाऱ्यांवर दबाव टाकले गेले. नंतर या नोटिसांना केराची टोपली दाखविण्यात आली.नामंजूर गृहप्रकल्पमंजूर झाले कसे?पंचगंगेच्या पूररेषेतील बांधकामे ही एक-दोन वर्षांतील नाहीत. गेल्या बारा-तेरा वर्षांपासूनची आहेत. आयुक्त बदलले की नियम बदलले गेले. प्रत्येक आयुक्तांंची दिशाभूल करायला हेच मूठभर बिल्डर, कारभारी नगरसेवक पुढे असायचे. खानविलकर पेट्रोल पंपाच्या परिसरातील काही गृहप्रकल्पांना परवानगी नाकारली गेली. मात्र कालांतराने तेच नव्याने मंजूर झाले. यामागचे गुपित उघड आहे. ‘दाम अन् दम’ देऊन प्रकल्पांना मंजुरी मिळविली.८० गृहप्रकल्प, ५०० बंगल्यांचे बांधकामसन २००५च्या महापुरानंतर पूररेषा निश्चित झाल्यापासून आतापर्यंत उत्तरेश्वर ते शिवाजी पूल, खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज, न्यू पॅलेस परिसर, रमणमळा, शासकीय धान्य गोदाम, कसबा बावडा, लाईन बाजार, कदमवाडी, भोसलेवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प ते तावडे हॉटेल या परिसरातील पूररेषेत मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत.त्यामध्ये ७० ते ८० मोठ्या गृहप्रकल्पांचा समावेश असून ५०० ते ५५० बंगल्यांच्या बांधकामांचा समावेश आहे. शिवाय पाच ते सहा मोठ्या रुग्णालयांचाही समावेश आहे. परवानगीशिवाय बांधलेल्या घरांची तर मोजदादच नाही.