शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांध गुंडगिरी रोखावी

By admin | Updated: April 30, 2016 00:43 IST

श्रीपाल सबनीस : मायबोली प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार सोहळा

राधानगरी : जातीच्या नासकेपणातून दहशतवाद जन्माला येतो. धार्मिक, राजकीय, झोपडपट्टीदादा व यांसारख्या अन्य गुंडगिरीपेक्षा धार्मिक गुंडगिरीचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे. इस्लामचा शांती संदेश समजून न घेता काही विकृती निर्माण होते. तसेच हिंदू धर्माला काळिमा फासणारे काही वाचाळ महाराज निर्माण झाले आहेत. त्यामुळे धर्मांध गुंडगिरी रोखणे हेच सर्व प्रकारच्या लेखकांचे उद्दिष्ट असायला पाहिजे. कोणत्याही भीतीला न डगमगता लेखणीचा वापर करणे आवश्यक आहे, असे परखड मत ज्येष्ठ समीक्षक व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. येथील मायबोली साहित्य प्रतिष्ठानच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. ग्रामीण साहित्यिक कृष्णात खोत अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध कार्यक्रम झाले.यावेळी सबनीस म्हणाले, जगभरात फैलावणारा दहशतवाद रोखणे हे सर्व राष्ट्रांपुढील मोठे आव्हान आहे. सर्व देश यासाठी एकत्र येत आहेत. सत्य, अहिंसा व शांततेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान जगभरात पसरत आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा गांधी विचाराने प्रभावित आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात फिरताना गांधी, बुद्ध व भगवान महावीरांच्या विचारांचा प्रचार करतात. सांस्कृतिक एकतावाद हा नवा राष्ट्रवाद व्हावा. सेक्युलर भारत निर्माण होऊन जातीव्यवस्था संपण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.मातीशी इमान राखणाऱ्या ग्रामीण प्रतिभा व परंपरा वंदनीय आहेत. बोलीशी जोडलेली भाषा व खेड्यातील सांस्कृतिक श्रीमंती हेच खरे धन आहे, असे गौरवोद्गार सबनीस यांनी काढले. यावेळी कृष्णात खोत म्हणाले, सर्वच क्षेत्रांत सर्व प्रकारची दहशत वाढली आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा नाही, हीसुद्धा एक प्रकारची दहशतच आहे. निसर्गवाद हा जीवनाचा मंत्र झाला, तरच जगणे सुसह्य होईल. यावेळी सुनील माने, किरण गुरव, प्रकाश काणकेकर, चंद्रशेखर कांबळे, संजय पारकर, मधुकर मुसळे, संजय डवर, साताप्पा शेरवाडे, सुचित वंजारे, सुरेश चौरे यांचा सत्कार करण्यात आला. कवी बाळ पोतदार यांच्या ‘येणे वाग्यज्ञे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी जि. प. शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, प्रांताधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार शिवाजी शिंदे, सरपंच सुनीता गुरव, विलास पाटील उपस्थित होते. प्रा. चंद्रशेखर कांबळे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)