शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

धर्मांध गुंडगिरी रोखावी

By admin | Updated: April 30, 2016 00:43 IST

श्रीपाल सबनीस : मायबोली प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार सोहळा

राधानगरी : जातीच्या नासकेपणातून दहशतवाद जन्माला येतो. धार्मिक, राजकीय, झोपडपट्टीदादा व यांसारख्या अन्य गुंडगिरीपेक्षा धार्मिक गुंडगिरीचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे. इस्लामचा शांती संदेश समजून न घेता काही विकृती निर्माण होते. तसेच हिंदू धर्माला काळिमा फासणारे काही वाचाळ महाराज निर्माण झाले आहेत. त्यामुळे धर्मांध गुंडगिरी रोखणे हेच सर्व प्रकारच्या लेखकांचे उद्दिष्ट असायला पाहिजे. कोणत्याही भीतीला न डगमगता लेखणीचा वापर करणे आवश्यक आहे, असे परखड मत ज्येष्ठ समीक्षक व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. येथील मायबोली साहित्य प्रतिष्ठानच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. ग्रामीण साहित्यिक कृष्णात खोत अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध कार्यक्रम झाले.यावेळी सबनीस म्हणाले, जगभरात फैलावणारा दहशतवाद रोखणे हे सर्व राष्ट्रांपुढील मोठे आव्हान आहे. सर्व देश यासाठी एकत्र येत आहेत. सत्य, अहिंसा व शांततेचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान जगभरात पसरत आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा गांधी विचाराने प्रभावित आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभरात फिरताना गांधी, बुद्ध व भगवान महावीरांच्या विचारांचा प्रचार करतात. सांस्कृतिक एकतावाद हा नवा राष्ट्रवाद व्हावा. सेक्युलर भारत निर्माण होऊन जातीव्यवस्था संपण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.मातीशी इमान राखणाऱ्या ग्रामीण प्रतिभा व परंपरा वंदनीय आहेत. बोलीशी जोडलेली भाषा व खेड्यातील सांस्कृतिक श्रीमंती हेच खरे धन आहे, असे गौरवोद्गार सबनीस यांनी काढले. यावेळी कृष्णात खोत म्हणाले, सर्वच क्षेत्रांत सर्व प्रकारची दहशत वाढली आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा नाही, हीसुद्धा एक प्रकारची दहशतच आहे. निसर्गवाद हा जीवनाचा मंत्र झाला, तरच जगणे सुसह्य होईल. यावेळी सुनील माने, किरण गुरव, प्रकाश काणकेकर, चंद्रशेखर कांबळे, संजय पारकर, मधुकर मुसळे, संजय डवर, साताप्पा शेरवाडे, सुचित वंजारे, सुरेश चौरे यांचा सत्कार करण्यात आला. कवी बाळ पोतदार यांच्या ‘येणे वाग्यज्ञे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. यावेळी जि. प. शिक्षण समितीचे सभापती अभिजित तायशेटे, प्रांताधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार शिवाजी शिंदे, सरपंच सुनीता गुरव, विलास पाटील उपस्थित होते. प्रा. चंद्रशेखर कांबळे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)