शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

लोकशाहीच्या बचावासाठी सनातनी प्रवृत्तींना रोखा : गणेश देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:56 IST

मनुवादी आणि सनातनी विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाहीवर संकट आले आहे. लोकशाहीच्या बचावासाठी सनातनी प्रवृत्ती हाणून पाडण्याची गरज असून, त्यासाठी

ठळक मुद्देपन्हाळा येथे श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिर

पन्हाळा : मनुवादी आणि सनातनी विचारांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकशाहीवर संकट आले आहे. लोकशाहीच्या बचावासाठी सनातनी प्रवृत्ती हाणून पाडण्याची गरज असून, त्यासाठी आजच्या युवापिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ भाषा संशोधक आणि विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी येथे केले.

येथे श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवन नॉलेज सिटीचे अध्यक्ष पी. आर. भोसले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, प्रा. एन. आर. भोसले, डॉ. सुरेखा देवी, आदी मान्यवर उपस्थित होते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने हे शिबिर घेतले जाते. ‘मी आणि माझा भवताल’ हा बीजविषय होता.

डॉ. देवी म्हणाले, सध्या जगात भांडवलशाही एकवटत आहे. त्यामुळे एकूण राज्यव्यवस्थेचे नियंत्रण भांडवलशाहीकडे येत आहे. हे समाजासाठी घातक आहे. जेव्हा संपत्तीचे केंद्रीकरण होते, तेव्हा विविधतेवर हल्ला होतो. देशात वेगळा विचार मांडणाऱ्यांवर ट्रोलिंगच्या माध्यमातून हल्ले केले जात असून, ही अपराधी प्रवृत्ती दिवसें-दिवस वाढतच आहे.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘मी व माझे भावविश्व’ या विषयावर; तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी कृष्णात कोरे यांनी ‘विज्ञान, अंधश्रद्धा व विवेकी जीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत अजित अभ्यंकर सरकारच्या विद्यार्थीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. ज्येष्ठ विचारवंत इरफान इंजिनियर यांनी सत्ताधाºयांकडून लोकांच्या मनात जाणीवपूर्वक अन्य जात व धर्मियांच्याबद्दल पूर्वग्रह रूजविले जात असल्याची टीका केली.

पर्यावरण तज्ज्ञ अभिजित घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी वंचित समाजघटकांचे प्रश्न मांडून ते कसे सोडवता येतील याची माहिती दिली. नाट्यलेखक प्रा. डॉ. हिमांशू स्मार्त, पत्रकार संजय आवटे, प्राचार्य आनंद मेणसे, ज्येष्ठ अभ्यासक दत्ता देसाई यांनी विवेचन केले. शाहीर कॉम्रेड सदाशिव निकम यांनी शाहिरी जलशातून प्रबोधनाचा जागर केला.

शिबिरात लिंगभाव, मैत्री-प्रेम-विवाह, विवाह संस्था या विषयांवरील लघुपटांचे प्रदर्शन झाले. सुरेश शिपूरकर यांनी संकलित केलेल्या ‘सत्य काय आहे’ या पुस्तिकेचे प्रकाशन हस्ते झाले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. मेघा पानसरे, प्रा. डॉ. मंजुश्री पवार, सुशील लाड, मल्हार पानसरे, प्रशांत मगदूम, अरविंद भोसले आदींनी परिश्रम घेतले.कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर प्रबोधन शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी विवेचन केले. यावेळी प्रा. मेघा पानसरे, प्रा. पी. आर. भोसले व प्रा. डॉ. जयसिंगराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.