शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

‘गोकुळ’साठीही आता ‘बटण दाबा’

By admin | Updated: October 26, 2014 00:05 IST

चाचपणी सुरू : निवडणुकीत ‘ईव्हीएम’चा वापर शक्य

प्रवीण देसाई \कोल्हापूरवेळ आणि अचूकता येऊन निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत यंदा ‘ईव्हीएम’ मशीनचा वापर करण्याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या संचालकांना ‘गोकुळ’मध्ये पाठविण्यासाठी मतपत्रिकेवर शिक्का माराव्या लागणाऱ्या मतदाराला आता लोकसभा, विधानसभेप्रमाणे ‘ईव्हीएम’चे बटण दाबावे लागणार आहे.विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघा (गोकुळ)च्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. ठराव, पॅनल यादृष्टीने काही प्रमाणात तयारी सुरू आहे. संचालक व समर्थक मतदार यांच्याकडून ही तयारी सुुरू असताना राज्य सहकार निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ मशीनच्या वापराबाबत चाचपणी सुरू केली आहे. मतपत्रिका (बॅलेट पेपर)मुळे मते बाद होण्याचे मोठे प्रमाण, मतमोजणीसाठी लागणारा प्रचंड वेळ आणि यासाठी लागणारे मनुष्यबळ यांमुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया लांबते हे सर्वश्रुत आहे. त्या दृष्टीने पावले उचलत निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’चा वापर सुरू केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचे चांगले निकाल मिळाले. कमी वेळात व पारदर्शीपणे या यंत्राद्वारे मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडली; परंतु या मशीनचा वापर सुरू होऊनही सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा वापर झालेला नाही. येत्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये या मशीनचा वापर करून ही प्रक्रिया सुलभ करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही किंवा तो कधी होणार हे निश्चित झालेले नाही. तरीही आयोगाने त्यादृष्टीने पावले उचलली असल्याचे समजते.