शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

अमर आडके यांचे प्रतिपादन : वडणगे येथे सिद्धी ग्रुपच्यावतीने व्याख्यान

By admin | Updated: January 10, 2015 00:27 IST

हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात अनेक युद्धे लढली गेली.

वडणगे : पावनखिंडीतील संग्राम हा हिंदवी स्वराज्याच्या संघर्षातील तेजस्वी पैलू असून, इतिहासात या संग्रामाला वेगळे महत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी केले.वडणगे (ता. करवीर) येथील सिद्धी ग्रुपच्यावतीने पार्वती मंदिर परिसरात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे महाप्रबंधक एम. आर. रावत होते. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, एस. डी. मुरगी प्रमुख उपस्थित होते.डॉ. आडके म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात अनेक युद्धे लढली गेली. चिंचवाड परिसरात १६६० मध्ये शिवाजीराजांनी पहिली मैदानी लढाई करून ती जिंकली. परिसरातील अनेक किल्ले त्यांनी काबीज केले. शत्रूशी सामना करताना बचाव आणि जनतेचे कमीत कमी नुकसान व शत्रूची दमछाक करून जेरीला आणण्यासाठी पन्हाळा या गडाची त्यांनी निवड केली. हा डावपेच पूर्ण यशस्वी झाला.पावनखिंडीच्या रणसंग्रामात अग्रक्रमाने शिवा काशीद यांचे नाव घ्यावे लागेल. आपण मृत्यूच्या गुहेत मरायला चाललो आहोत, हे माहीत असूनही स्वराज्यासाठी, स्वामींसाठी आनंदाने ते सामोरे गेले. शिवाजी महाराजांचे रूप घेऊन एक दिवसाचा शिवाजी बनण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या बलिदानातून सुरू झालेला पावनखिंडीचा रणसंग्राम बाजीप्रभूंच्या हौतात्म्यापर्यंत येऊन संपतो. मात्र, पन्हाळ्यावर खरा इतिहास सांगितला जात नाही, हे आपले दुर्दैव असल्याचेही डॉ. अडके म्हणाले.रणजित व्हरगे यांनी स्वागत केले. रणजित पाटील, संतोष पाटील, विश्वजित पाटील, सचिन केसरकर, प्रमोद पोवार, सचिन मगदूम, उमेश नांगरे, राजेंद्र जाधव, आदींनी संयोजन केले. (वार्ताहर)