शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

अमर आडके यांचे प्रतिपादन : वडणगे येथे सिद्धी ग्रुपच्यावतीने व्याख्यान

By admin | Updated: January 10, 2015 00:27 IST

हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात अनेक युद्धे लढली गेली.

वडणगे : पावनखिंडीतील संग्राम हा हिंदवी स्वराज्याच्या संघर्षातील तेजस्वी पैलू असून, इतिहासात या संग्रामाला वेगळे महत्त्व आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर आडके यांनी केले.वडणगे (ता. करवीर) येथील सिद्धी ग्रुपच्यावतीने पार्वती मंदिर परिसरात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बीएसएनएलचे महाप्रबंधक एम. आर. रावत होते. तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, एस. डी. मुरगी प्रमुख उपस्थित होते.डॉ. आडके म्हणाले, हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरात अनेक युद्धे लढली गेली. चिंचवाड परिसरात १६६० मध्ये शिवाजीराजांनी पहिली मैदानी लढाई करून ती जिंकली. परिसरातील अनेक किल्ले त्यांनी काबीज केले. शत्रूशी सामना करताना बचाव आणि जनतेचे कमीत कमी नुकसान व शत्रूची दमछाक करून जेरीला आणण्यासाठी पन्हाळा या गडाची त्यांनी निवड केली. हा डावपेच पूर्ण यशस्वी झाला.पावनखिंडीच्या रणसंग्रामात अग्रक्रमाने शिवा काशीद यांचे नाव घ्यावे लागेल. आपण मृत्यूच्या गुहेत मरायला चाललो आहोत, हे माहीत असूनही स्वराज्यासाठी, स्वामींसाठी आनंदाने ते सामोरे गेले. शिवाजी महाराजांचे रूप घेऊन एक दिवसाचा शिवाजी बनण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या बलिदानातून सुरू झालेला पावनखिंडीचा रणसंग्राम बाजीप्रभूंच्या हौतात्म्यापर्यंत येऊन संपतो. मात्र, पन्हाळ्यावर खरा इतिहास सांगितला जात नाही, हे आपले दुर्दैव असल्याचेही डॉ. अडके म्हणाले.रणजित व्हरगे यांनी स्वागत केले. रणजित पाटील, संतोष पाटील, विश्वजित पाटील, सचिन केसरकर, प्रमोद पोवार, सचिन मगदूम, उमेश नांगरे, राजेंद्र जाधव, आदींनी संयोजन केले. (वार्ताहर)