शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची यादी तयार

By admin | Updated: April 23, 2016 01:44 IST

चंद्रकांतदादा पाटील : व्हनाळी येथे अन्नपूर्णा पाणी योजनेच्या विस्तारीकरणाचा प्रारंभ

म्हाकवे : आघाडी सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. पूर्वी या जन्मात केलेले अपकृत्य पुढच्या जन्मात फेडायला येत होते. परंतु या जन्मात केलेले अपकृत्य याच जन्मात फेडायला लागत आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छगन भुजबळ हे आहे. सहकारामध्ये भ्रष्टाचार केलेल्यांची यादी तयार असून कोणी कधी तुरुंगात जाणार याची ही तारीख ठरलेली आहे, असा गौप्यस्फोट सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. व्हनाळी (ता. कागल) येथील अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरण प्रारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात कागलसह जिल्ह्यात अनेक बोगस निराधार लाभार्थी घुसडण्यात आले. त्याची छाननी करून त्यांना कमी करताना आमच्या घरावर मोर्चे काढण्यात आले, परंतु मी घाबरणारा मंत्री नाही. कारण आम्ही कुठल्याही सामान्य माणसाची फसगत न करता या यादीतून धनदांडग्यांनाच वगळले आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, संजय घाटगेंसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीलाही मुबलक पाणी मिळत आहे. प्रास्ताविक दत्ताजीराव घाटगे यांनी केले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, आदींची भाषणे झाली.संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, हिंदुराव शेळके, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संग्रामसिंह कुपेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, वीरेंद्र मंडलिक, राजेखान जमादार, आदी प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहकारमंत्र्यांच्या घरात गडी राहतोचंद्रकांतदादा पाटील यांनी मुश्रीफांचे सर्व घोटाळे बाहेर काढले तर दादांचे जोडेही उचलण्यासाठी तयार आहोत. साखर कारखान्यात १० टनांची ८ टन पावती देऊन शेतकऱ्यांची लूट सुरूआहे. १० टन उसाबरोबर १० टनाची पावती घोरपडे कारखान्यातून मिळाली तर सहकारमंत्र्यांच्या घरात मी गडी राहतो, असे आवाहनही माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे यांनी केले. आता ऊस गाळपाचा विचार करूसंजय घाटगे यांनी ‘अन्नपृूर्णा’च्या माध्यमातून ओसाड डोंगरमाथ्यावर एक लाख टन ऊस निर्माण केला आहे. आता हा तयार होणारा ऊस याच ठिकाणी गाळप होण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आवश्यकता पडली तर सहकार कायद्यात बदल करु पण घाटगे यांना ऊस गाळप परवाना मिळवून देऊ, असा शब्दही पाटील यांनी दिला.