शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची यादी तयार

By admin | Updated: April 23, 2016 01:44 IST

चंद्रकांतदादा पाटील : व्हनाळी येथे अन्नपूर्णा पाणी योजनेच्या विस्तारीकरणाचा प्रारंभ

म्हाकवे : आघाडी सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. पूर्वी या जन्मात केलेले अपकृत्य पुढच्या जन्मात फेडायला येत होते. परंतु या जन्मात केलेले अपकृत्य याच जन्मात फेडायला लागत आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छगन भुजबळ हे आहे. सहकारामध्ये भ्रष्टाचार केलेल्यांची यादी तयार असून कोणी कधी तुरुंगात जाणार याची ही तारीख ठरलेली आहे, असा गौप्यस्फोट सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. व्हनाळी (ता. कागल) येथील अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरण प्रारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात कागलसह जिल्ह्यात अनेक बोगस निराधार लाभार्थी घुसडण्यात आले. त्याची छाननी करून त्यांना कमी करताना आमच्या घरावर मोर्चे काढण्यात आले, परंतु मी घाबरणारा मंत्री नाही. कारण आम्ही कुठल्याही सामान्य माणसाची फसगत न करता या यादीतून धनदांडग्यांनाच वगळले आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, संजय घाटगेंसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीलाही मुबलक पाणी मिळत आहे. प्रास्ताविक दत्ताजीराव घाटगे यांनी केले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, आदींची भाषणे झाली.संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, हिंदुराव शेळके, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संग्रामसिंह कुपेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, वीरेंद्र मंडलिक, राजेखान जमादार, आदी प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहकारमंत्र्यांच्या घरात गडी राहतोचंद्रकांतदादा पाटील यांनी मुश्रीफांचे सर्व घोटाळे बाहेर काढले तर दादांचे जोडेही उचलण्यासाठी तयार आहोत. साखर कारखान्यात १० टनांची ८ टन पावती देऊन शेतकऱ्यांची लूट सुरूआहे. १० टन उसाबरोबर १० टनाची पावती घोरपडे कारखान्यातून मिळाली तर सहकारमंत्र्यांच्या घरात मी गडी राहतो, असे आवाहनही माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे यांनी केले. आता ऊस गाळपाचा विचार करूसंजय घाटगे यांनी ‘अन्नपृूर्णा’च्या माध्यमातून ओसाड डोंगरमाथ्यावर एक लाख टन ऊस निर्माण केला आहे. आता हा तयार होणारा ऊस याच ठिकाणी गाळप होण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आवश्यकता पडली तर सहकार कायद्यात बदल करु पण घाटगे यांना ऊस गाळप परवाना मिळवून देऊ, असा शब्दही पाटील यांनी दिला.