शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शालेय स्तरावरच होणार स्पर्धा परीक्षेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 00:00 IST

राज्य सरकारचा निर्णय : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; गरीब, गरजू व हुशार मुलांना उपयोग होणार

भरत शास्त्री-- बाहुबली --लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अन्य राज्याच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. या उद्देशाने राज्य सरकार शिक्षण विभागाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र निर्माण करणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करावे, हा या मागचा हेतू आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याने एमपीएससी, यूपीएससी, आयएएस, आयपीएस, आदी स्पर्धा परीक्षांची माहिती शालेय स्तरावरून देण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीतील मुले या मार्गदर्शन केंद्रांमुळे स्पर्धा परीक्षांकडे वळतील, अशी आशा सरकारला आहे.हे मार्गदर्शन केंद्र माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत असणार असून, राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षण विभागांना असे केंद्र शालेय स्तरावर स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने अल बोगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.या समितीतील तज्ज्ञांनी नागरी सेवा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असणारा न्यूनगंड, परीक्षेची काठिण्य पातळी, गैरसमज, माहितीचा अभाव यामुळे हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे पाठ फिरवितात, असे निरीक्षण मांडले आहे. त्यामुळेच या समितीच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेची मदतदेखील घेण्यात येणार आहे. ही बाब उल्लेखनीय आहे. या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करणे, ग्रामीण भागातील शिक्षकांना माहिती देऊन त्यांना प्रेरित करणे, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंदांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची ओळख होऊन त्याची भीती देखील निघून जाण्यास मदत होईल.गोमटेश बेडगे, मुख्याध्यापक, एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली.केंद्राची रूपरेखाशिक्षकच मुलांना मार्गदर्शन करणारगरजेनुसार जिल्ह्यातील यशस्वी अधिकारी मार्गदर्शन करणारस्पर्धा परीक्षेची भीती, न्यूनगंड व गैरसमज दूर करण्यासाठी मदत होणारसर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना