शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शालेय स्तरावरच होणार स्पर्धा परीक्षेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2016 00:00 IST

राज्य सरकारचा निर्णय : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; गरीब, गरजू व हुशार मुलांना उपयोग होणार

भरत शास्त्री-- बाहुबली --लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अन्य राज्याच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. या उद्देशाने राज्य सरकार शिक्षण विभागाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र निर्माण करणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करावे, हा या मागचा हेतू आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याने एमपीएससी, यूपीएससी, आयएएस, आयपीएस, आदी स्पर्धा परीक्षांची माहिती शालेय स्तरावरून देण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीतील मुले या मार्गदर्शन केंद्रांमुळे स्पर्धा परीक्षांकडे वळतील, अशी आशा सरकारला आहे.हे मार्गदर्शन केंद्र माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत असणार असून, राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षण विभागांना असे केंद्र शालेय स्तरावर स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने अल बोगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.या समितीतील तज्ज्ञांनी नागरी सेवा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असणारा न्यूनगंड, परीक्षेची काठिण्य पातळी, गैरसमज, माहितीचा अभाव यामुळे हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे पाठ फिरवितात, असे निरीक्षण मांडले आहे. त्यामुळेच या समितीच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेची मदतदेखील घेण्यात येणार आहे. ही बाब उल्लेखनीय आहे. या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करणे, ग्रामीण भागातील शिक्षकांना माहिती देऊन त्यांना प्रेरित करणे, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंदांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची ओळख होऊन त्याची भीती देखील निघून जाण्यास मदत होईल.गोमटेश बेडगे, मुख्याध्यापक, एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली.केंद्राची रूपरेखाशिक्षकच मुलांना मार्गदर्शन करणारगरजेनुसार जिल्ह्यातील यशस्वी अधिकारी मार्गदर्शन करणारस्पर्धा परीक्षेची भीती, न्यूनगंड व गैरसमज दूर करण्यासाठी मदत होणारसर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना