शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

प्रयाग चिखली ग्रामसभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवडणगे : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ग्रामसभेत दोन कोटी ११ लाखांच्या पेयजल योजनेच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ होऊन दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही गटांच्या समांतर सभा व घोषणाबाजीने गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या लोकांना ग्रामपंचायत आवारातून हटविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडणगे : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ग्रामसभेत दोन कोटी ११ लाखांच्या पेयजल योजनेच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ होऊन दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही गटांच्या समांतर सभा व घोषणाबाजीने गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या लोकांना ग्रामपंचायत आवारातून हटविण्यात आले. घटनास्थळी करवीरचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी भेट देऊन पोलीस गाडीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.१५ आॅगस्टनिमित्त बोलविण्यात आलेल्या गावसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नूतन भगतसिंग रजपूत होत्या. ग्रामपंचायत सदस्य व पेयजल योजनेचे अध्यक्ष केवलसिंह रजपूत यांनी प्रास्ताविकात केलेल्या कामांचा आढावा घेऊन पेयजल योजनेच्या कामाबाबत माहिती देत असताना विरोधकांनी पेयजलच्या कारभारावर आक्षेप घेतला.यावेळी नळजोडणीकरिता आदा केलेली रक्कम आणि कामाचे मूल्यांकन याबाबत माजी जि. प. सदस्य एस. आर. पाटील व बळी कळके यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांचा खुलासा करण्यावरून सभेत दोन्ही गटांच्या लोकांकडून गोंधळास सुरुवात झाली. त्यातूनच वादावादी होऊन हातघाई सुरू झाली. बघता-बघता सभागृहात धुमश्चक्री उडाली. यात सभागृहात मिळेल ते साहित्य भिरकावण्यात येऊ लागले. खुर्च्यांचीही फेकाफेकी करण्यात आली. दोन्ही गटांकडील कार्यकर्ते एकमेकांवर अक्षरक्ष: तुटून पडलेले होते. यामध्ये अनेकजण किरकोळ जखमी झाले. बराच वेळ गदारोळ चालू होता.त्यानंतर दोन्ही गटांचे लोक सभागृहातून बाहेर येऊन देखील अंगावर धावून जाण्याचे प्रकार करीत होते. ग्रामपंचायत प्रांगणात दोन्ही गटांनी तळ ठोकून समांतर सभा घेतल्या. त्या ठिकाणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत होते. दरम्यानच्या काळात घटनास्थळी करवीर पोलिसांची कुमक आली. त्यांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले; परंतु दोन्ही गटांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने वातावरण तणावाचे बनले. त्यानंतर पोलिसांची जादा कुमक मागवून लोकांना घटनास्थळावरून पांगविले. या पार्श्वभूमीवर गावात दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.