शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रयाग चिखली ग्रामसभेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवडणगे : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ग्रामसभेत दोन कोटी ११ लाखांच्या पेयजल योजनेच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ होऊन दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही गटांच्या समांतर सभा व घोषणाबाजीने गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या लोकांना ग्रामपंचायत आवारातून हटविण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडणगे : प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ग्रामसभेत दोन कोटी ११ लाखांच्या पेयजल योजनेच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ होऊन दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही गटांच्या समांतर सभा व घोषणाबाजीने गावात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांच्या लोकांना ग्रामपंचायत आवारातून हटविण्यात आले. घटनास्थळी करवीरचे पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी भेट देऊन पोलीस गाडीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.१५ आॅगस्टनिमित्त बोलविण्यात आलेल्या गावसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नूतन भगतसिंग रजपूत होत्या. ग्रामपंचायत सदस्य व पेयजल योजनेचे अध्यक्ष केवलसिंह रजपूत यांनी प्रास्ताविकात केलेल्या कामांचा आढावा घेऊन पेयजल योजनेच्या कामाबाबत माहिती देत असताना विरोधकांनी पेयजलच्या कारभारावर आक्षेप घेतला.यावेळी नळजोडणीकरिता आदा केलेली रक्कम आणि कामाचे मूल्यांकन याबाबत माजी जि. प. सदस्य एस. आर. पाटील व बळी कळके यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांचा खुलासा करण्यावरून सभेत दोन्ही गटांच्या लोकांकडून गोंधळास सुरुवात झाली. त्यातूनच वादावादी होऊन हातघाई सुरू झाली. बघता-बघता सभागृहात धुमश्चक्री उडाली. यात सभागृहात मिळेल ते साहित्य भिरकावण्यात येऊ लागले. खुर्च्यांचीही फेकाफेकी करण्यात आली. दोन्ही गटांकडील कार्यकर्ते एकमेकांवर अक्षरक्ष: तुटून पडलेले होते. यामध्ये अनेकजण किरकोळ जखमी झाले. बराच वेळ गदारोळ चालू होता.त्यानंतर दोन्ही गटांचे लोक सभागृहातून बाहेर येऊन देखील अंगावर धावून जाण्याचे प्रकार करीत होते. ग्रामपंचायत प्रांगणात दोन्ही गटांनी तळ ठोकून समांतर सभा घेतल्या. त्या ठिकाणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत होते. दरम्यानच्या काळात घटनास्थळी करवीर पोलिसांची कुमक आली. त्यांनी दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले; परंतु दोन्ही गटांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्याने वातावरण तणावाचे बनले. त्यानंतर पोलिसांची जादा कुमक मागवून लोकांना घटनास्थळावरून पांगविले. या पार्श्वभूमीवर गावात दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.