शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

प्रांताधिकारी डॉ. खिलारी यांचा निरोप समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:50 IST

गारगोटी : महापूर, कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह शासनाच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधून प्रांताधिकारी डॉ. ...

गारगोटी : महापूर, कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह शासनाच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधून प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केलेल्या कामांमुळे तालुक्यातील जनतेच्या मनात शासकीय व्यवस्थेबद्दल आपुलकी निर्माण झाली आहे. अधिकारी हा जनतेचा सेवक असतो याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉ. खिलारी आहेत, असे गौरवोद्गार अध्यक्षीय भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी काढले. त्या डॉ. खिलारी यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. प्रमुख उपस्थितीत सर्व पक्षांचे पदाधिकारी होते.

यावेळी डॉ. खिलारी म्हणाले, हा तालुका नैसर्गिक विविधतेने नटलेला आहे. येथे जनता नेहमी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यामुळेच अनेक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करताना कोणतीही अडचण भासली नाही. या जनतेच्या पाठबळावर आणि सहकाऱ्यांच्या मदतीमुळे जिल्ह्यात नावलौकिक झाला व पुरस्कार मिळाला.

या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम, संतोष मेंगाणे, प्रा. अर्जुन आबिटकर, माजी जि.प. सदस्य राहुल देसाई, नाथाजी पाटील, प्रवीणसिंह सावंत, सत्यजित जाधव, पोलीस निरीक्षक संजय मोरे, किरण चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई, माजी सरपंच आनंदराव आबिटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यत्नाळकर, गटविकास अधिकारी एस. जे. पवार, नायब तहसीलदार ,तलाठी संघटनेचे अध्यक्ष एफ. आय. भटारे, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, संदीप आबिटकर, नेताजी गुरव, पोलीस पाटील संघटना, सर्व तलाठी, महसूल कर्मचारी, तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन आणि आभार टी. डी. पाटील यांनी मानले.

फोटो ओळ प्रांताधिकारी डॉ संपत खिलारी यांचा महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी सत्कार केला. यावेळी एफ. आय. भटोरे, अर्जुन आबिटकर, संजय मोरे आदी उपस्थित होते.