शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीला कौतुकाची थाप

By admin | Updated: September 14, 2016 01:15 IST

लोकमत ‘नंबर वन फूड अवॉर्ड’चे शानदार वितरण : शिव मिसळ, दीपक वडा, नेहा दाबेली, खवय्या, केट्री, वेलची, रेस्टो, कावा, महालक्ष्मी गृहोद्योगला पुरस्कार

कोल्हापूर : ‘कोल्हापूर म्हणजे अस्सल खवय्यांचे गाव’. येथील विविध शाकाहारी पदार्थांची चव आणि खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचविणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंटना सोमवारी ‘लोकमत नंबर वन फूड अवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. खाद्य क्षेत्रात पहिल्यांदाच देण्यात आलेल्या या पुरस्कारांनी कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीलाच कौतुकाची थाप दिली. ‘लोकमत’च्यावतीने आयोजित ‘नंबर वन फूड अवॉर्ड’ पुरस्काराचे वितरण सोमवारी राजारामपुरी व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते. व्यासपीठावर ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले उपस्थित होते. यावेळी ‘थाळी’, ‘मिसळ’, ‘लोकप्रिय हॉटेल’, ‘पंजाबी’, ‘चायनीज’, ‘फास्टफूड’ आणि ज्युरी या सात विभागांमध्ये पुरस्कार देण्यात आले.यावेळी विष्णू मनोहर यांनी शेफ म्हणून आपला झालेला प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला. ते म्हणाले, माझे वडील चित्रकार, आई किराणा घराण्याची गायिका आणि मी फाईन आर्ट झालेला विद्यार्थी. खाद्यसंस्कृती या क्षेत्रात मी अपघातानेच आलो. जेवण बनविता येत नव्हते म्हणून विविध खाद्यपदार्थांच्या गाड्यांशेजारी उभा राहून रेसिपी शिकलो. तेथून माझा प्रवास सुरू झाला. या आवडीतूनच खाद्यपदार्थांवर पुस्तक लिहून लेखक झालो. आता शिवकालीन खाद्यसंस्कृतीवर मालिका करीत आहे. प्रास्ताविकात ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले म्हणाले, पाककृती हे एक शास्त्र आहे. कंदमुळापासून सुरू झालेला प्रवास आता सीझनिंग फूडपर्यंत येऊन पोहोचला आहे. कोल्हापूरला मोठी खाद्यसंस्कृती लाभली आहे. ‘लोकमत नंबर वन फूड अवॉर्ड’ पुरस्कारांच्या निमित्ताने या खाद्यसंस्कृतीला व्यासपीठ मिळाले आहे. ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख म्हणाले, ‘लोकमत’च्या सखी मंच, बाल विकास मंच, युवा नेक्स्टच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण केले आहे. या ‘नंबर वन फूड अवॉर्ड’च्यानिमित्ताने कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीचे वैविध्य प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात १३५ रेस्टॉरंटने सहभाग घेतला. त्यातील विविध प्रकारांत ३० रेस्टॉरंटची निवड करण्यात आली. त्यातून ६ कॅटॅगरीतून एक विजेता घोषित करण्यात आला. यावेळी स्पर्धेतील सहभागी हॉटेल व रेस्टॉरंटच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून शेफ विष्णू मनोहर, जिशांत खान, प्राजक्ता शहापूरकर यांनी काम पाहिले. सुखदा आठले यांनी विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधला. (प्रतिनिधी)खाद्यसंस्कृतीलाकमी लेखू नकाविष्णू मनोहर म्हणाले, एखाद्याला करिअर करता आले नाही की त्याला हॉटेलिंग क्षेत्रात आणले जाते; पण या क्षेत्राला कमी लेखू नका. ‘कुक’ हा संवेदनशील, विचारवंत, टेक्निशियन, विज्ञानाचे ज्ञान असलेला कलाकार असतो. या पाच भूमिकांमधून तो खाद्यपदार्थ आपल्यासमोर आणतो. तुम्ही बनविलेला पदार्थ नवीन खाद्यपरंपरा निर्माण करतो. आपल्या क्षेत्रात आवडीने काम करा, संधीचा फायदा घ्या. पहिले सादरीकरण ‘लोकमत सखी मंच’मध्येचविष्णू मनोहर यांनी आपल्या शेफ म्हणून सुरू झालेल्या प्रवासात पहिले योगदान लोकमत ‘सखी मंच’चे असल्याचे सांगितले. ‘सखी मंच’च्या एका कार्यक्रमात त्यांचा ‘रेसिपी शो’ झाला. त्यानंतर आजतागायत तीन हजार २०० टीव्ही शो सादर केले. यावेळी त्यांनी ‘लोकमत’च्या ‘नंबर वन फूड अवॉर्ड’ या अनोख्या स्पर्धेबद्दलही ‘लोकमत’चे अभिनंदन केले. पीठल्याने केली सुटका..यावेळी मनोहर यांनी कवी सुरेश भट यांची ‘मरणाने केली सुटका’ ही कविता आपल्या ‘खवय्या स्टाईल’मध्ये सादर केली. डाळींच्या वाढलेल्या दराचा संदर्भ घेत त्यांनी ‘पीठल्याने केली सुटका, वरणाने छळले होते’ ही ओळ सादर केली, तसेच डायटिंग या प्रकारावर वि. वा. शिरवाडकरांचा ‘जगावे की मरावे’ हा प्रसिद्ध संवाद ‘खावं की की खाऊ नये हा एकच सवाल आहे’ या शब्दांत सादर केला.