शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

बोजा पडला तरी वीज सवलत द्या

By admin | Updated: January 3, 2015 00:09 IST

सुरेंद्र जैन : अन्यथा, कर्नाटकात जाण्याचा उद्योजकांचा इशारा

शिरोली : महाराष्ट्र शासनाने उद्योगांना वाचविण्यासाठी सवलतीच्या दरात वीज द्यावी, यासाठी शासनावर कर्जाचा बोजा पडला तरीही शासनाने तो सोसावा, अन्यथा आम्ही कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार बैठकीत दिला. बैठकीस जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जैन म्हणाले, राज्य शासन राज्यात कोणतीही आपत्ती आली तर कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करते. वीज दरवाढ ही उद्योगांवरील मोठी आपत्ती आणि संकट आहे. ती दूर करण्यासाठी राज्य शासनावर जरी कर्जाचा बोजा पडत असला, तरी तो शासनाने सोसून उद्योजकांना इतर राज्यांप्रमाणे सवलतीच्या दरात वीज द्यावी. उद्योगांना मोठी मंदी आहे. तरी यातून शासनाने उद्योजकांची सुटका करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे कोल्हापूरला आले. उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निघून गेले. त्यांनी उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. उद्योग जगवायचे असतील, तर विजेच्या दरात सवलत द्यायलाच पाहिजे, अन्यथा उद्योग परराज्यांत जातील. राज्यातील उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज मिळत नाही, म्हणून उद्योग परराज्यात चालले आहेत. महावितरणकडून वीज उचललेली नाही. त्यामुळे महावितरणवर पडलेला बोजा भरून काढण्यासाठी वीज दरवाढ केली जाते. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात विजेचे दर अधिक असल्याने महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत. राज्यात आहेत त्या उद्योगांच्या विजेचे दर शासन कमी करू शकत नाही आणि नवीन दोन कोटींची गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना काय सुविधा देणार? शासनाने उद्योगांना वीज सवलत नाही दिली तर उद्योग बंद पडतील. तसेच आम्हाला सध्या कोणत्याच सुविधा नकोत, फक्त वीज दरवाढ कमी करा, असेही ‘गोशिमा’चे अध्यक्ष अजित आजरी म्हणाले.उद्योगांना चालू महिन्यात फक्त २० टक्के इतकी कामाच्या आॅर्डरी आहेत आणि मग उद्योजक कसा जगेल. एका बाजूला मोठी मंदी आणि दुसऱ्या बाजूला वीज दरवाढ यामुळे उद्योजक होरपळून जात आहे, असे राजू पाटील म्हणाले.यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंगचे अध्यक्ष रवींद्र तेंडुलकर, कागल मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, अतुल पाटील, सचिन पाटील, संजय उरमट्टी, संजय जोशी, सचिव टी. एस. घाटगे, आदी उपस्थित होते.