शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

बोजा पडला तरी वीज सवलत द्या

By admin | Updated: January 3, 2015 00:09 IST

सुरेंद्र जैन : अन्यथा, कर्नाटकात जाण्याचा उद्योजकांचा इशारा

शिरोली : महाराष्ट्र शासनाने उद्योगांना वाचविण्यासाठी सवलतीच्या दरात वीज द्यावी, यासाठी शासनावर कर्जाचा बोजा पडला तरीही शासनाने तो सोसावा, अन्यथा आम्ही कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी पत्रकार बैठकीत दिला. बैठकीस जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जैन म्हणाले, राज्य शासन राज्यात कोणतीही आपत्ती आली तर कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करते. वीज दरवाढ ही उद्योगांवरील मोठी आपत्ती आणि संकट आहे. ती दूर करण्यासाठी राज्य शासनावर जरी कर्जाचा बोजा पडत असला, तरी तो शासनाने सोसून उद्योजकांना इतर राज्यांप्रमाणे सवलतीच्या दरात वीज द्यावी. उद्योगांना मोठी मंदी आहे. तरी यातून शासनाने उद्योजकांची सुटका करावी. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे कोल्हापूरला आले. उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निघून गेले. त्यांनी उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. उद्योग जगवायचे असतील, तर विजेच्या दरात सवलत द्यायलाच पाहिजे, अन्यथा उद्योग परराज्यांत जातील. राज्यातील उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज मिळत नाही, म्हणून उद्योग परराज्यात चालले आहेत. महावितरणकडून वीज उचललेली नाही. त्यामुळे महावितरणवर पडलेला बोजा भरून काढण्यासाठी वीज दरवाढ केली जाते. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात विजेचे दर अधिक असल्याने महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत. राज्यात आहेत त्या उद्योगांच्या विजेचे दर शासन कमी करू शकत नाही आणि नवीन दोन कोटींची गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना काय सुविधा देणार? शासनाने उद्योगांना वीज सवलत नाही दिली तर उद्योग बंद पडतील. तसेच आम्हाला सध्या कोणत्याच सुविधा नकोत, फक्त वीज दरवाढ कमी करा, असेही ‘गोशिमा’चे अध्यक्ष अजित आजरी म्हणाले.उद्योगांना चालू महिन्यात फक्त २० टक्के इतकी कामाच्या आॅर्डरी आहेत आणि मग उद्योजक कसा जगेल. एका बाजूला मोठी मंदी आणि दुसऱ्या बाजूला वीज दरवाढ यामुळे उद्योजक होरपळून जात आहे, असे राजू पाटील म्हणाले.यावेळी कोल्हापूर इंजिनिअरिंगचे अध्यक्ष रवींद्र तेंडुलकर, कागल मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, अतुल पाटील, सचिन पाटील, संजय उरमट्टी, संजय जोशी, सचिव टी. एस. घाटगे, आदी उपस्थित होते.