शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

वीज कधीच दुसरी संधी देत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 01:14 IST

मुख्य अभियंता सोनवणे : वीज सुरक्षा सप्ताहास प्रारंभ

कोल्हापूर : दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचा अनेक वीज उपकरणांशी संबंध येत असतो. अशी वीज उपकरणे हाताळताना अतिआत्मविश्वास जिवावर बेतू शकतो; कारण वीज कधीच दुसरा चान्स देत नाही. त्यामुळे सुरक्षिततेचे उपाय योजल्याशिवाय विजेची उपकरणे हाताळू नयेत, असे आवाहन महावितरण कोल्हापूर परिमंडलचे प्रभारी मुख्य अभियंता जितेंद्र सोनवणे यांनी केले.राज्यात ‘वीज सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जात आहे. कोल्हापुरात विद्युत निरीक्षक कार्यालय, महावितरण व कोल्हापूर जिल्हा इलेक्ट्रिकल कॉँट्रॅक्टर असोसिएशन यांच्यातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी त्याच्या उद्घाटनाच्या समारंभात सोनवणे बोलत होते. व्यासपीठावर महापालिकेचे उपायुक्त श्रीधर पाटणकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजाराम बुरुड, महापारेषणचे अधीक्षक अभियंता अनिल कोलप, विद्युत निरीक्षक एफ. एम. मुल्ला, इलेक्ट्रिकल कॉँट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश चाळके, आदींची उपस्थिती होती.सुरक्षेची साधने उपलब्ध असली तरीही त्यांचा सर्रास उपयोग होत नसल्याने विजेच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; म्हणूनच सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जनतेची विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करावी लागत असल्याचे विद्युत निरीक्षक मुल्ला यांनी सांगितले. सप्ताहात रोज किमान आठ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत. कार्यक्रमास महावितरणचे कार्यकारी अभियंते सुनील माने, राजेंद्र हजारे, आनंदराव माने, एन. बी. बारसिंग, सागर मारुलकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे उपमहाव्यवस्थापक मोहन चव्हाण, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, आदींसह वीज अभियंते, उपस्थित होते.