शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण झालेल्या वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जामंत्र्यांकडून विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

कोल्हापूर : इचलकरंजी येथील महावितरण कार्यालयाची तोडफोड व वसुलीवेळी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांची रविवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी फोनद्वारे ...

कोल्हापूर : इचलकरंजी येथील महावितरण कार्यालयाची तोडफोड व वसुलीवेळी मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांची रविवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी फोनद्वारे विचारपूस केली. या कर्मचाऱ्यांशी स्वत: बोलत त्यांनी मनोबल वाढवत हे काम अधिक नेटाने आणि प्रामाणिकपणे करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा शब्दांत आश्वस्त केले.

वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी मे. हनुमान इंडस्ट्रीजचे मालक गजानन जाधव या औद्योगिक ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून शुक्रवारी महावितरणच्या साजणी शाखा कार्यालय येथे गजानन जाधव, स्वप्निल जाधव, सचिन खाडे व इस्माईल पेंढारे यांनी महावितरण अधिकारी, कर्मचारी यांना शिवीगाळ, धक्काबुक्की व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयात गजानन जाधवसह इतर १५ ते २० जणांनी धुडगूस घालून दहशत निर्माण करीत कार्यालयाची तोडफोड करून अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की व मारहाण केली. महावितरणकडून संबंधिताविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्थानक, इचलकरंजी व पोलीस स्थानक हातकणंगले येथे स्वतंत्ररीत्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. वारंवार विनंती, पाठपुरावा व आवाहन करूनही वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा नियमानुसार सूचना देऊन वीजपुरवठा थकबाकी वसुलीसाठी खंडित करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करून वीजपुरवठा सुरळीत ठेवला. अशा अप्रिय घटना घडणे निंदनीय आहे. त्यामुळेच अशा घटनांमुळे वसुलीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होऊ नये म्हणून स्वत: ऊर्जामंत्र्यांनी पुढाकार घेत या घटनेचा निषेध करत या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला.

चौकट

तर असे प्रकार वाढतील

इचलकरंजीत मनसेने केलेल्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही, पण सरकारनेही जनतेची आर्थिक अडचण लक्षात घ्यायला हवी. लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ व्हावीत म्हणून गेली आठ महिने सरकारकडे आर्जव केले जात आहे. त्यामुळे सरकारने यात वेळीच लक्ष घालावे, नाही तर जनताच रस्त्यावर उतरली आणि अशी आंदोलने वाढली तर जबाबदार धरु नये, असे राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी म्हटले आहे.