शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चाच्या ऊर्जेला हवे विधायकतेचे वळण

By admin | Updated: May 9, 2017 00:41 IST

जयसिंगराव पवार : ‘मराठा क्रांती मोर्चा एक अन्वयार्थ’ पुस्तकाचे प्रकाशन; स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात घरापासून झाली पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : मराठ्यांनी इतिहास घडविला, पण कधी लिहिला नाही. मराठा क्रांती मोर्चा म्हणजे त्यांच्या व्यथेचा महास्फोट आहे. त्याची फूग हंगामी राहता कामा नये. लाखो लोक एकत्र येऊन राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करू शकतात हा आत्मविश्वास आम्हाला मिळाला. सगळीकडे अंधारमय वातावरण असताना मोर्चाने प्रकाशवाट दाखविली. मोर्चाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या ऊर्जेला आकाशात विरू न देता त्याचे विधायकतेत रूपांतर झाले पाहिजे, असे प्रतिपादन सोमवारी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये ‘मराठा क्रांती मोर्चा एक अन्वयार्थ’ या संपत देसाई व पत्रकार सुनील कोंडूसकर यांनी संपादन केलेल्या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भारत पाटणकर होते. व्यासपीठावर डॉ. राजन गवस, डॉ. प्रकाश पवार, हुमायुन मुरसल उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘मराठा’ या शब्दाचे जगभरात मोठे आकर्षण आहे. ही केवळ जात नाही तर त्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक पैलू आहेत. महाराष्ट्राबाहेर आपण गेलो की मराठा. शिवाजी महाराजांचा इतिहास फ्रेंच, डच, इंग्लिश इतिहासकारांनी लिहिला. त्यामुळे आपल्याला शिवाजी महाराजांचे मोठेपण कळाले. आज मराठा क्रांती मोर्चाने गर्दीचे उच्चांक मोडले याचे कौतुक आहे. मात्र, तो कोपर्डी घटना, अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि आरक्षण या तीन प्रश्नांपुरताच मर्यादित राहू नये. मोर्चात महिलांना दिलेला प्राधान्य हा केवळ दिखाऊपणा ठरू नये तर स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात घरापासून झाली पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न न्यायालयीन आहे. लाखोंचा मोर्चा काढल्याने तो सुटणार नाही. त्यामुळे मोर्चाची व्याप्ती वाढवत त्यात शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अशी मागणी केली पाहिजे. डॉ. प्रकाश पवार म्हणाले, मोर्चामुळे आपल्या मानगुटीवर बसलेले इतिहासाचे भूत आता उतरू लागले आहे. समाजातील महिला त्यांच्या स्वातंत्र्याविषयी प्रश्न विचारू लागल्या आहेत. हक्क मिळविण्याच्या नव्या चळवळीचे प्रतिबिंब या मोर्चात उमटले. हा मोर्चा कोणत्याही धर्म-जाती विरोधात नाही, तर तो आपली व्यापकता मांडण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ. राजन गवस म्हणाले, एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या भूमिकेमागील सत्य समजून न घेता आपण त्याला जातीयवादी ठरवून मोकळे होतो. तहयात शोषितांचे जगणे झेललेल्या या समाजाचे प्रश्न शेती आणि स्त्रीची अवहेलना यामुळे पुढे आले. स्त्री मुक्ती झाली तर जातिअंताचा लढा अंतिम टप्प्यात येईल. मोर्चाचे पुढे काय होईल हे भविष्य ठरवेल. आता आव्हान अभ्यासक आणि संशोधकांसमोर आहे. ही वेळ उद्विग्न होण्याची नव्हे तर उदार होण्याची आहे. हुमायुन मुरसल म्हणाले, जागतिकीकरणाच्या या युगात सगळे जाती-धर्म पिसून निघणार आहे. जेवढे दु:ख अन्य समाजाने भोगले तेवढीच दु:खे मराठा समाजाच्याही वाट्याला आली. भारत पाटणकर म्हणाले, मराठा समाज सुरुवातीपासूनच शोषित राहिला आहे. त्यामुळे सामाजिक, आर्थिक मागास हा निकष असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. जातिअंतानेच समाजाची प्रगती होईल. संपत देसाई यांनी प्रास्ताविक, सुधीर नलवडे यांनी सूत्रसंचालन केले.ब्राह्मणांची पोरं का दिसत नाही..डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, गल्ली-बोळातल्या तरुण मंडळांतील पोरं जयंती, उत्सवाच्या नावाखाली वाट्टेल ते करतात, नाचतात; पण त्यात ब्राह्मणाचा एकही मुलगा नसतो. गरीब, आत्महत्या करणारा, माथाडी कामगार यांच्यामध्ये एकही ब्राह्मण नाही. आमचे अनेक प्रश्न आहेत. जे अगदी घरापासून सुरू होतात. त्यांच्याकडे आपण गांभीर्याने कधी पाहणार. आज गरिबांचे राज्य नाही तर त्यांच्या नावाने राज्य केले जाते.