शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

वीज सवलतीचा चेंडू आयोगाकडे

By admin | Updated: March 18, 2015 00:51 IST

सवलतीबाबत संभ्रमावस्था : ऊर्जामंत्र्यांचा यंत्रमागधारक संघटनांना सल्लो

राजाराम पाटील - इचलकरंजी यंत्रमाग उद्योगाला वीजदराची सवलत व स्वतंत्र वर्गवारीचा चेंडू शासनाने आता महाराष्ट्र ऊर्जा नियामक आयोगाच्या कोर्टात टोलवला आहे. त्यासाठी यंत्रमागधारकांच्या संघटनांनी आयोगाकडे प्रयत्न करावेत, असा सल्ला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने सवलतीच्या वीजदराबाबत वस्त्रोद्योगात संभ्रमावस्था पसरली आहे.महाराष्ट्रामध्ये शेतीनंतर वस्त्रोद्योगात मुबलक रोजगार उपलब्ध आहे. देशातील एकूण यंत्रमागांपैकी सुमारे ५० टक्के म्हणजे बारा लाखांहून अधिक यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. अशा वस्त्रोद्योगावर सव्वाकोटी जनता अवलंबून असल्याने गेली वीस वर्षे शासनाकडून यंत्रमाग उद्योगाला सवलतीचा वीजदर दिला जात आहे. उद्योगांना देण्यात येणाऱ्या विजेच्या सवलतीसाठी शासन अनुदान देते; पण आॅगस्ट २०१३ मध्ये झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे विजेच्या दराची सवलत एकदमच बंद झाली. त्यावेळी असलेल्या कॉँग्रेसच्या आघाडी सरकारने पुढे येणारी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घरगुती व उद्योगांच्या वीज ग्राहकांसाठी दरमहा ७०६ कोटी रुपये अनुदान चालू केले आणि यंत्रमाग उद्योगाला पूर्ववत वीजदराची सवलत मिळू लागली.पण, गतवर्षी बदललेल्या भाजप सरकारने अनुदान रद्द केले आणि यंत्रमागांसह अन्य उद्योगांच्या विजेच्या दरात प्रचंड वाढ झाली. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. तेव्हा नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू होते. अधिवेशनात वीजदराचे अनुदान पूर्ववत सुरू करण्याची घोषणा शासनाने केली; पण हे अनुदान एकाच महिन्याचे आणि फक्त उद्योगापुरतेच असल्याचे नंतर लक्षात आले. त्यामुळे घरगुती विजेची दरवाढ कायम राहिली. तर उद्योगांनाही डिसेंबरपासून दरवाढीला सामोरे जावे लागले.महाराष्ट्रात अन्य राज्यांपेक्षा विजेचे दर अधिक आहेत. त्यामुळे यंत्रमागांसह अन्य उद्योगांची उत्पादने अन्य राज्यांच्या तुलनेत महाग असल्याने राज्यात उत्पादनांना चढा भाव मिळत नाही. परिणामी उद्योगधंदे तोट्यात जात आहेत. म्हणून अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही विजेचे भाव मिळावेत, यासाठी उद्योजकांनी शासनाकडे वारंवार गाऱ्हाणे मांडले; पण गेल्या तीन महिन्यात उद्योजकांच्या पदरात काहीच मिळत नाही म्हणून उद्योजक हवालदिल झाले आहेत. उद्यांजक उद्योगधंदे शेजारच्या राज्यात नेण्याची भाषा बोलू लागले आहेत. यंत्रमाग वीजदर सवलतीसाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी काल, सोमवारी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस राज्यातील यंत्रमाग केंद्रांमधील विधानसभा सदस्य व यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी स्वतंत्र वर्गवारीसाठी यंत्रमागधारकांनी ऊर्जा आयोगासमोर आपले म्हणणे मांडावे. त्यासाठी राज्यातील यंत्रमाग केंद्रांमधील आमदार व खासदारांनी संघटितरीत्या प्रयत्न करावेत, असा सल्ला ऊर्जामंत्र्यांनी दिला. (पूर्वार्ध)तीन महिन्यांत २४०० कोटींचा भुर्दंडडिसेंबर २०१४ नंतर शासनाने वीजदराचे दरमहा ७०६ कोटी रुपयांचे अनुदान दिले नसल्याने सुमारे २४०० कोटी रुपयांचा भुर्दंड राज्यातील वीज ग्राहकांवर बसला आहे. यंत्रमाग उद्योगाला तीन रुपये २५ पैसे प्रतियुनिट दराने मिळणारी वीज आता ४.२५ रुपये दराने मिळत आहे.