शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भांडी विक्रेत्यांना ५० लाखांचा दिवसाकाठी बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अनेक व्यावसायिकांचे उरले-सुरलेही कंबरडे मोडले आहे. त्यापैकीच एक भांडी विक्रेत्यांनाही मोठ्या अर्थिक संकटाला ...

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत अनेक व्यावसायिकांचे उरले-सुरलेही कंबरडे मोडले आहे. त्यापैकीच एक भांडी विक्रेत्यांनाही मोठ्या अर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अशा १६०हून अधिक व्यावसायिकांचे दिवसाकाठी सुमारे ५० लाखांहून अधिकचे नुकसान होत आहे. तर जीएसटी. बँक कर्ज, व्यवसायासाठी घेतलेले सावकरी कर्ज, पाल्यांच्या शाळांची फी अशा एक ना अनेक समस्यांमुळे दिवसेंदिवस हा व्यवसाय मोडकळीस आला आहे.

भारतीय जीवन पद्धतीमध्ये प्रत्येक नागरिकाला दिवसातून दोनवेळा जेवण्याची सवय आहे. त्यात मग कोणते पदार्थ खायचे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र, ते जेवण कोणत्या भांड्यात करायचे, असा प्रश्न आला तर अनेकांना अशावेळी भांडी दुकाने आठवतात. मात्र, तिच जर बंद असतील तर अनेकांच्या जेवणाचे वांदेच होतात. सध्या लाॅकडाऊनमुळे ठराविक काळापुरतेच अत्यावश्यक सेवेत नसलेल्या दुकानांना सकाळी ७ ते ११ पर्यंतच उघडे ठेवण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे गेल्या २६ दिवसांत अपेक्षित व्यवसाय नसल्याने जिल्ह्यातील १६०हून अधिक भांडी विक्रेत्यांना अर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसाला सुमारे ५० लाखांचा फटका या व्यावसायिकांना बसत आहे. लाॅकडाऊनचा कालावधी वाढला तर जगायचं कसं आणि कामगारांचा पगार कसा करायचा, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारने कराची वसुली, बँक हप्त्यांच्या वसुलीमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी हे व्यावसायिक करत आहेत.

जिल्ह्यात दुकाने - १६०

निर्भर असणाऱ्यांची संख्या - २०००हून अधिक

दिवसाकाठी नुकसान - सुमारे ५० लाख

चौकट

अडचणी अनंत

व्यवसाय ठप्प झाल्यामुळे जीएसटी रिटर्न, बँकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. कामगारांचे पगार, मुलांच्या शिक्षणाचे शुल्क, व्यवसायासाठी घेतलेली हात उसने (सावकारी कर्जे), दुकानभाडे, महापालिका कर, अशा एक ना अनेक अडचणींना या व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे.

कोट

भांडी विक्री व्यवसाय अत्यावश्यक सेवेत नसल्याने केवळ दोन ते तीन तासच दुकाने उघडी ठेवता येतात. त्यातून कामगारांचा पगारसुद्धा निघत नाही. याशिवाय बँकांचे कर्जाचे हप्ते, जीएसटी कर, व्यावसायिक कर, आदी कसे भागवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने करांमध्ये सवलत द्यावी.

- अमर वणकुद्रे, भांडी व्यापारी