शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

राज्यातील राष्ट्रीय पेयजल योजनांना स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:15 IST

सध्याच्या राष्ट्रीय पेयजल योजना या पुढील १५ वर्षांच्या वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून आखली जाते. मात्र ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पुढील वर्र्षापासून होणाºया योजना ३० वर्षे वाढणारी लोकसंख्या विचारात करून आखल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देनव्या जलजीवन मिशनची लवकरच घोषणा

समीर देशपांडेकोल्हापूर : केंद्र शासन लवकरच नव्या ‘जलजीवन मिशन’ची घोषणा करणार असून, त्यामुळेच सध्या राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या असून, याबाबत लवकरच लेखी आदेशही काढण्यात येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनांच्या माध्यमातून गावागावांना पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. मात्र केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाकांक्षी अशा ‘जलजीवन मिशन’ची घोषणा करण्यात येणार आहे.

प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा, सध्या रोज प्रतिमाणसी ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून, ते वाढवून आता रोज प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्याच्या राष्ट्रीय पेयजल योजना या पुढील १५ वर्षांच्या वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून आखली जाते. मात्र ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पुढील वर्र्षापासून होणाºया योजना ३० वर्षे वाढणारी लोकसंख्या विचारात करून आखल्या जाणार आहेत.

केंद्र शासनाकडून नव्या ‘मिशन’च्या अंमलबजावणीची वेगाने कार्यवाही सुरू असल्यामुळे सध्या कार्यारंभ आदेश दिलेल्या योजना वगळून सर्व योजनांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ज्या राष्ट्रीय पेयजल योजनांना कार्यारंभ आदेश मिळाले आहेत. त्याच योजनांची कामे सुरू राहणार असून, प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांचे कामही थांबविण्यात येणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात १६० राष्ट्रीय पेयजल योजनांना तांत्रिक सहमती देण्यात आली होती. त्यांपैकी ८७ योजनांना प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली होती. त्यांपैकी ५० कामे सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. या ५० योजना वगळता उर्वरित ११० योजनांचे काम सध्या तरी आहे त्या स्तरावर थांबविण्यात आले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक