शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील राष्ट्रीय पेयजल योजनांना स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:15 IST

सध्याच्या राष्ट्रीय पेयजल योजना या पुढील १५ वर्षांच्या वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून आखली जाते. मात्र ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पुढील वर्र्षापासून होणाºया योजना ३० वर्षे वाढणारी लोकसंख्या विचारात करून आखल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देनव्या जलजीवन मिशनची लवकरच घोषणा

समीर देशपांडेकोल्हापूर : केंद्र शासन लवकरच नव्या ‘जलजीवन मिशन’ची घोषणा करणार असून, त्यामुळेच सध्या राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या असून, याबाबत लवकरच लेखी आदेशही काढण्यात येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पेयजल योजनांच्या माध्यमातून गावागावांना पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. मात्र केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पिण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाकांक्षी अशा ‘जलजीवन मिशन’ची घोषणा करण्यात येणार आहे.

प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा, सध्या रोज प्रतिमाणसी ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून, ते वाढवून आता रोज प्रतिमाणसी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्याच्या राष्ट्रीय पेयजल योजना या पुढील १५ वर्षांच्या वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून आखली जाते. मात्र ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून पुढील वर्र्षापासून होणाºया योजना ३० वर्षे वाढणारी लोकसंख्या विचारात करून आखल्या जाणार आहेत.

केंद्र शासनाकडून नव्या ‘मिशन’च्या अंमलबजावणीची वेगाने कार्यवाही सुरू असल्यामुळे सध्या कार्यारंभ आदेश दिलेल्या योजना वगळून सर्व योजनांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या ज्या राष्ट्रीय पेयजल योजनांना कार्यारंभ आदेश मिळाले आहेत. त्याच योजनांची कामे सुरू राहणार असून, प्रशासकीय मान्यता मिळालेल्या योजनांचे कामही थांबविण्यात येणार आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात १६० राष्ट्रीय पेयजल योजनांना तांत्रिक सहमती देण्यात आली होती. त्यांपैकी ८७ योजनांना प्रशासकीय कामांना मंजुरी मिळाली होती. त्यांपैकी ५० कामे सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. या ५० योजना वगळता उर्वरित ११० योजनांचे काम सध्या तरी आहे त्या स्तरावर थांबविण्यात आले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater transportजलवाहतूक