शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘मानिनी’चे दप्तरच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:01 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भुदरगड नागरी पतसंस्थेनंतर जिल्ह्णात ठेवीदारांना सर्वाधिक त्रास देणाºया पतसंस्थांच्या यादीत ‘तपोवन’ व ‘मानिनी’ या संस्थांचा क्रमांक वरचा आहे. ‘मानिनी’चे मूळ दप्तरच गायब आहे. ठेवीदारांची संख्या किती, हीच माहिती अवसायकांकडे नसल्याने ठेवी मिळणे दूरच राहिले आहे. या संस्थांचे कर्जदार निवांत आहेत; मात्र ठेवीदारांवर उपासमारीची वेळ ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भुदरगड नागरी पतसंस्थेनंतर जिल्ह्णात ठेवीदारांना सर्वाधिक त्रास देणाºया पतसंस्थांच्या यादीत ‘तपोवन’ व ‘मानिनी’ या संस्थांचा क्रमांक वरचा आहे. ‘मानिनी’चे मूळ दप्तरच गायब आहे. ठेवीदारांची संख्या किती, हीच माहिती अवसायकांकडे नसल्याने ठेवी मिळणे दूरच राहिले आहे. या संस्थांचे कर्जदार निवांत आहेत; मात्र ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली असताना सहकार विभागाचे हातावर हात आहेत.जिल्हा कार्यक्षेत्र असणाºया तपोवन पतसंस्थेचे सोळा शाखांच्या माध्यमातून कामकाज सुरू होते. ग्राहकांनी मोठ्या विश्वासाने पतसंस्थेत ठेवी ठेवल्या; पण संचालक मंडळाच्या कारनाम्यांमुळे संस्था अडचणीत आली आणि आॅगस्ट २०१६ मध्ये संस्था अवसायनात काढली. त्यावेळी २ हजार ७४८ कर्जदारांकडे ९ कोटी ५० लाखांची कर्जे थकीत होती; तर ६ हजार ५३९ ठेवीदारांच्या आठ कोटींच्या ठेवी देय होत्या. संस्था अडचणीत आल्याने ठेवीदारांनी पैसे काढण्यास सुरुवात केली; पण त्यांना पैसे मिळाले नाहीत.अनेक ठेवीदारांनी ठेव, ठेव म्हणून तळमळून जीव सोडला; तर अनेकजण अंथरुणावर पडून आहेत; पण औषधोपचारांसाठी पैसे नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. मध्यंतरी राज्य सरकारने ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी ‘तपोवन’ला २ कोटी ७९ लाखांचे पॅकेज दिले. अजून सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या ठेवींचे वाटप व्हायचे आहे. वसुली अधिकारी नसल्याने गेले नऊ महिने वसुलीचे कामकाज ठप्प आहे.‘मानिनी’च्या संचालकांचे कारनामे साºया महाराष्टÑात गाजले. मुलांचे लग्नकार्य, शिक्षणासाठी जमविलेली पुंजी मिळत नसल्याने ठेवीदार अक्षरश: तडफडत आहेत. अवसायकांकडे पतसंस्थेचे मूळ दप्तरच नाही; त्यामुळे ठेवी परत द्यायच्या लांबच; पण ठेवीदारांची संख्या कितीही हेच माहिती नाही. जो मागायला येतो, तोच ठेवीदार गृहीत धरायचा असाच प्रकार सध्या सुरू आहे. ‘भुदरगड’, ‘तपोवन’ व ‘मानिनी’प्रमाणे अजूनही ‘बाबूराव महाजन’, ‘राजीव नागरी’ सारख्या डझनभर पतसंस्थांनी ठेवीदारांच्या गळ्याला फास लावला आहे. याबाबत वेळकाढूपणाची कार्यवाही बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने सहकार विभाग लक्ष देणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. (उत्तरार्ध)उच्चभ्रूंची संस्था तरीही..मानिनी महिला पतसंस्थेत सर्व संचालकांबरोबर एकूणच प्रशासन उच्चभ्रू होते. त्यामुळे संस्था बुडणार नाही, असा विश्वास सामान्य ठेवीदाराला होता. त्यामुळेच मोलमजुरी करून सर्वसामान्यांनी पोटाला चिमटा देऊन जमलेले पैसे पतसंस्थेत ठेवले; पण त्यांनीही रंग दाखविल्याने सहकारावरील उरलासुरला विश्वासही उडाला आहे.कलम ‘८८’ची कारवाई रद्द होतेच कशी?‘मानिनी’वर कलम ८८ नुसार साडेपाच कोटींची जबाबदारी संचालकांवर निश्चित केली होती; पण तत्कालीन विभागीय सहनिबंधकांनी ती रद्द ठरविली. ‘तपोवन’चीही दोन वेळा झालेली कलम ‘८८’ची कारवाई रद्द ठरविली. सहकार विभागच अशा संचालकांना पाठीशी घालणार असेल, तर ठेवीदारांनी न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.