शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पिराचीवाडीतील किल्ल्याच्या बुरूजाची दुरवस्था

By admin | Updated: October 1, 2015 23:22 IST

इतिहासप्रेमींतून नाराजी : ऐतिहासिक वास्तूची डागडुजी व्हावी

बोरवडे : कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथील किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज आजही इतिहासाची साक्ष देत खंबीरपणे उभा आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांची उदासीनता यामुळे किल्ल्याच्या बुरूजांची पूर्ण दुरवस्था झाल्याने हा बुरूज अखेरच्या घटका मोजत आहे. या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी व्हावी, अशी मागणी इतिहासप्रेमींतून होत आहे.बिद्री साखर कारखान्याच्या ईशान्येला आठ किलोमीटर अंतरावर असलेले पिराचीवाडी हे साधारण दीड हजार लोकवस्तीचे उंचवट्यावर वसलेले गाव. छत्रपती शिवरायांच्या काळात कसबा वाळवे येथील पराक्रमी सेनापती सर्जेराव घाटगे यांच्याकडे या किल्ल्याचे वतन होते. पीर नावाचा फकीर गावामध्ये तसेच परिसरामधून भिक्षा मागून फिरत होता. त्यामुळे या गावचे नाव पिराचीवाडी पडले.पिराचीवाडी हे ठिकाण उंच ठिकाणी वसल्याने आजूबाजूच्या परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी याची निर्मिती केली होती. या किल्ल्यावर तबेला, पाणी पिण्यासाठी विहिरी, तलाव आहेत. किल्ल्याची तटबंदी तब्बल दहा फूट रुंद असून, या तटबंदीवरून तोफा सहजपणे फिरविता येईल, अशी रचना केल्याचे दिसून येते. १९६० पर्यंत या किल्ल्याचे सात बुरूज शिल्लक होते. त्यापैकी बदलत्या काळात सध्या एकच बुरूज शिल्लक आहे. खंदकाच्या बाजूनेही सर्व बाहेरील बाजूंनी मोठी संरक्षक भिंत होती. ब्रिटिश काळामध्ये इंग्रजांनी या किल्ल्याची दुरवस्था केली. निसर्गरम्य अशा या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेण्यासाठी शाळेच्या सहली येत होत्या. इतिहासप्रेमी पर्यटक भेट देत होते; पण किल्ल्याच्या उरल्यासुरल्या आठवणींही बुरुजाच्या दुरवस्थेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याच्या स्मृती जपण्यात याव्यात, अशी इतिहासप्रेमींतून मागणी होत आहे. (वार्ताहर)