शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

मुरगूड-वाघापूरला जोडणारा पूल सापडला वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 1, 2015 00:05 IST

प्र्रशासनाच्या विरोधात संताप : रस्त्यामध्ये शेती जात असल्याने विरोध; योग्य मोबदल्याशिवाय काम करू न देण्याचा इशारा

अनिल पाटील - मुरगूड -कागल - भुदरगड तालुक्याला जोडणाऱ्या मुरगूड-वाघापूर दरम्यान वेदगंगा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; पण त्या पुलाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये मुरगूड आणि वाघापूर या दोन गावांतील शेतजमीन मोठ्या प्रमाणात जात असल्याने शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. विश्वासात न घेता मनमानी काम करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप असल्याने वाघापूर पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.संस्थानकालीन बाजारपेठ आणि प्रसिद्ध जनावरांचा बाजार मुरगूडमध्ये भरत असल्याने भुदरगड तालुक्यातील गारगोटी, कडगाव आणि तळ कोकणातील लोकांचा मुरगूडशी संपर्क साधण्यासाठी मुदाळतिट्टा मार्गे यावे लागते. दरम्यान, वाघापूर आणि मुरगूड यांच्यामध्ये वेदगंगा नदीवर पूल बांधला, तर या सर्वांचे २० ते ३० कि. मी. जादाचे अंतर कमी होईल, शिवाय वेळही वाचेल. यासाठी लोकांनी पुलाची मागणी उचलून धरली. लोकप्रतिनिधींनीही या पुलासाठी प्रयत्न करून शासनाकडून निधी आणला.पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. अगदी युद्धपातळीवर काम होत अल्पावधीतच ते काम पूर्णत्वाकडे आले आहे; पण प्रशासनाने त्या पुलाला जोडणारे मुरगूड व वाघापूरकडील रस्त्यांबाबत आपले धोरण गुलदस्त्यात ठेवले.पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने रस्त्याच्या कामासाठी लगबग सुरू झाली; पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता जातो त्यांनी मात्र त्याला प्रखर विरोध केला आहे. आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने रस्ता दाखविला आहे, तसा न करता पुलाच्या अगदी दोन्ही बाजूला थोड्याच अंतरावर मोठाले ‘यू’टर्न वळण ठेवल्याने वाहतुकीसाठी धोका पोहोचणार आहे. आराखड्यामध्ये दाखवलेल्या रस्त्याबाबत बाधित शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाने कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, त्यांनी दोनवेळा पुलाचे काम बंद पाडले आहे. आता पुन्हा एकदा बांधकाम विभागाचे अधिकारी, कागल व भुदरगडचे आमदार यांच्या समवेत शेतकऱ्यांशी चर्चा होणार असून, आपल्याला न्याय मिळत नाही, योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत हे काम करू द्यायचे नाही, अशा पवित्र्यात शेतकरी आहेत.दत्तमंदिराला धोकावेदगंगा नदीकाठावर मुरगूडचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तमंदिराला अगदी लागूनच या रस्त्याच्या भरावाचे काम सुरू आहे. जमिनीपासून ४० फूट भराव वरती जाणार असल्याने मंदिराला धोका पोहोचणार आहे. त्यामुळे रस्ता मंदिरापासून दूर घ्यावा, अशी मागणी तरुण व ग्रामस्थांनी केली आहे.