शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

मुरगूड-वाघापूरला जोडणारा पूल सापडला वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 1, 2015 00:05 IST

प्र्रशासनाच्या विरोधात संताप : रस्त्यामध्ये शेती जात असल्याने विरोध; योग्य मोबदल्याशिवाय काम करू न देण्याचा इशारा

अनिल पाटील - मुरगूड -कागल - भुदरगड तालुक्याला जोडणाऱ्या मुरगूड-वाघापूर दरम्यान वेदगंगा नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे; पण त्या पुलाला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यामध्ये मुरगूड आणि वाघापूर या दोन गावांतील शेतजमीन मोठ्या प्रमाणात जात असल्याने शेतकऱ्यांनी याला विरोध केला आहे. विश्वासात न घेता मनमानी काम करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप असल्याने वाघापूर पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.संस्थानकालीन बाजारपेठ आणि प्रसिद्ध जनावरांचा बाजार मुरगूडमध्ये भरत असल्याने भुदरगड तालुक्यातील गारगोटी, कडगाव आणि तळ कोकणातील लोकांचा मुरगूडशी संपर्क साधण्यासाठी मुदाळतिट्टा मार्गे यावे लागते. दरम्यान, वाघापूर आणि मुरगूड यांच्यामध्ये वेदगंगा नदीवर पूल बांधला, तर या सर्वांचे २० ते ३० कि. मी. जादाचे अंतर कमी होईल, शिवाय वेळही वाचेल. यासाठी लोकांनी पुलाची मागणी उचलून धरली. लोकप्रतिनिधींनीही या पुलासाठी प्रयत्न करून शासनाकडून निधी आणला.पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली. अगदी युद्धपातळीवर काम होत अल्पावधीतच ते काम पूर्णत्वाकडे आले आहे; पण प्रशासनाने त्या पुलाला जोडणारे मुरगूड व वाघापूरकडील रस्त्यांबाबत आपले धोरण गुलदस्त्यात ठेवले.पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने रस्त्याच्या कामासाठी लगबग सुरू झाली; पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता जातो त्यांनी मात्र त्याला प्रखर विरोध केला आहे. आराखड्यामध्ये ज्या पद्धतीने रस्ता दाखविला आहे, तसा न करता पुलाच्या अगदी दोन्ही बाजूला थोड्याच अंतरावर मोठाले ‘यू’टर्न वळण ठेवल्याने वाहतुकीसाठी धोका पोहोचणार आहे. आराखड्यामध्ये दाखवलेल्या रस्त्याबाबत बाधित शेतकऱ्यांबरोबर प्रशासनाने कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून, त्यांनी दोनवेळा पुलाचे काम बंद पाडले आहे. आता पुन्हा एकदा बांधकाम विभागाचे अधिकारी, कागल व भुदरगडचे आमदार यांच्या समवेत शेतकऱ्यांशी चर्चा होणार असून, आपल्याला न्याय मिळत नाही, योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत हे काम करू द्यायचे नाही, अशा पवित्र्यात शेतकरी आहेत.दत्तमंदिराला धोकावेदगंगा नदीकाठावर मुरगूडचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तमंदिराला अगदी लागूनच या रस्त्याच्या भरावाचे काम सुरू आहे. जमिनीपासून ४० फूट भराव वरती जाणार असल्याने मंदिराला धोका पोहोचणार आहे. त्यामुळे रस्ता मंदिरापासून दूर घ्यावा, अशी मागणी तरुण व ग्रामस्थांनी केली आहे.