शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
6
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
7
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
8
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
9
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
10
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
11
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
12
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
13
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
14
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
15
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
16
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
17
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
18
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
19
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन

डाळिंबाला आले सुगीचे दिवस.... शासनाने मारले, ‘लोकमत’ने तारले !

By admin | Updated: January 17, 2015 00:07 IST

आटपाडीत दर तेजीत : खरेदीसाठी राज्याबाहेरील शंभरावर व्यापारी दाखल

अविनाश बाड -आटपाडी   दोन-तीन दिवसांपासून आटपाडीत डाळींब खरेदीसाठी देशभरातून व्यापाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होऊन त्यांची संख्या शंभरावर गेली आहे. प्रथमच व्यापारी विक्रमी संख्येने एकाचवेळी दाखल झाल्याने डाळिंबाला पुन्हा तेजीचे दिवस आले. फुटलेली डाळिंबे कचऱ्यात फेकून देण्याऐवजी आता ती मुंबईच्या फूटपाथवर दिसणार आहेत. नाशिक, पुणे, बारामतीच्या ज्युस व्यापाऱ्यांनीही एकाच दिवसात फुटकी चार ट्रक डाळिंबे प्रथमच आटपाडीतून खरेदी केली आहेत. त्यामुळे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना आता कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे. पिढ्यान्पिढ्यांच्या दुष्काळावर मात करून आणि कष्टाच्या जोरावर शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार डाळिंबांची निर्मिती केली. पण, केंद्र शासनाने निर्यातीवर जाचक अटी लादल्याचे आणि थंडीचे कारण पुढे करून व्यापाऱ्यांनी डाळिंबाचे दर पाडले होते. आतापर्यंत अवघे २० ते २५ व्यापारीच आटपाडीत डाळिंबाची खरेदी करत होते. डाळिंबाचा ‘भगवा’ वाण ४० ते ५० रुपयांपर्यंत विकला जात होता. ‘लोकमत’ने दि. ५ जानेवारीपासून डाळिंबाच्या कमी दरासह शेतकऱ्यांचे दुखणे मांडले. परिणामी, जिल्ह्यातील अडतदारांनी देशभरातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून आटपाडीतील डाळिंबाची आवक आणि आताचे खरेदी दर सांगितले. त्यामुळे सध्या पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, दिल्ली, मुंबई, मदुराई, चेन्नई, मद्रास, लखनौ आणि कर्नाटकातून १०० हून अधिक व्यापारी खरेदीसाठी आले आहेत. त्यामुळे ५० रुपयांपर्यंत विकला जाणारा ‘भगवा’ वाण आता ८३ रुपये किलोपर्यंत गेला आहे. गत आठवड्यात १५ ते २५ रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या ‘गणेश’ या वाणाची डाळिंबे आता २५ ते ४० रुपये दराने विकली जात आहेत. फूटपाथवर विक्री करण्यासाठी मुंबईहून प्रथमच येथे आलेले व्यापारी ही उलकी डाळिंबे २५० ते ४०० रुपये प्रतिक्रेट दराने खरेदी करू लागले आहेत. जेजुरी, नाशिक, बारामती येथील ज्युस उत्पादकांनी आटपाडीत येऊन ‘ज्युस’ निर्मितीसाठी ५० रुपये ते ५०० रुपये क्रेट या दराने उलकी डाळिंबे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे २० टन डाळिंबे एका दिवसात विकली गेली आहेत. त्यातून शेतकऱ्यांना सुमारे चार लाख रुपये मिळतील. डाळिंबांची खरेदी करण्यासाठी परराज्यातील व्यापारी दलाल नेमू लागले आहेत. आठ-पंधरा दिवसांत डाळिंबांचे दर पुन्हा शंभरावर जाण्याची शक्यता अडतदारांनी व्यक्त केली.ऐन हंगामात अन्न आणि औषध प्रशासनाने अनारदाना आणि ज्युस उद्योगांवर छापे टाकून ते उद्योग बंद पाडले. त्यामुळे आटपाडीत शेतकऱ्यांना लाखो रुपयांची डाळिंबे कचऱ्यात फेकून द्यावी लागत होती. ‘लोकमत’ने याबाबत वारंवार सडेतोड वृत्त दिले. त्याची व्यापाऱ्यांसह संबंधित व्यावसायिकांमध्ये जोरदार चर्चा झाली. त्यामुळे प्रथमच आटपाडीत चार-पाच व्यावसायिकांनी फुटलेली डाळिंब खरेदी करण्यास सुरुवात केली. आटपाडीच्या डाळींब व्यापारी अडत संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ नागणे, अडतदार विठ्ठल सरगर आणि अडतदारांनी याबाबत ‘लोकमत’चे अभिनंदन केले.