शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा नसल्याने ‘पॉलिटेक्निक’च्या विद्यार्थ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

कोल्हापूर : महापुरामुळे मोबाइल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ...

कोल्हापूर : महापुरामुळे मोबाइल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहणार आहेत.

या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सत्रातील कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षा दि. १३ जुलैपासून ऑनलाइन एमसीक्यू पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये पदविका अभियांत्रिकीच्या तिन्ही वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली आणि कोकणामध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा खंडित झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचण निर्माण झाली आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर परीक्षकांनी त्यांच्या पॉलिटेक्निकच्या परीक्षा कक्षातून ऑनलाइन नजर ठेवायची आहे; पण महापुरामुळे या परीक्षकांनादेखील पॉलिटेक्निकपर्यंत जाता येत नाही. या तांत्रिक अडचणीबाबत पुढे काय करायचे याची कोणतीही सूचना अधिकृतपणे पॉलिटेक्निकमधील शिक्षकांना राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मिळालेली नाही. या मंडळाने लवकर सूचना करावी. अडचणीतील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

चौकट

ऋतुराज पाटील यांची उच्चशिक्षणमंत्र्यांकडे मागणी

सध्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन परीक्षा देताना मोबाइल नेटवर्क नसणे, खंडित वीजपुरवठा यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ट्विटरद्वारे केली आहे. या पाच जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थी महापुरामुळे परीक्षेपासून वंचित राहू शकणार आहेत.

प्रतिक्रिया

महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे. ते लक्षात घेऊन तंत्रशिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणे योग्य ठरणार आहे.

-प्रशांत पट्टलवार, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन