शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा नसल्याने ‘पॉलिटेक्निक’च्या विद्यार्थ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

कोल्हापूर : महापुरामुळे मोबाइल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ...

कोल्हापूर : महापुरामुळे मोबाइल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहणार आहेत.

या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सत्रातील कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षा दि. १३ जुलैपासून ऑनलाइन एमसीक्यू पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये पदविका अभियांत्रिकीच्या तिन्ही वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली आणि कोकणामध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा खंडित झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचण निर्माण झाली आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर परीक्षकांनी त्यांच्या पॉलिटेक्निकच्या परीक्षा कक्षातून ऑनलाइन नजर ठेवायची आहे; पण महापुरामुळे या परीक्षकांनादेखील पॉलिटेक्निकपर्यंत जाता येत नाही. या तांत्रिक अडचणीबाबत पुढे काय करायचे याची कोणतीही सूचना अधिकृतपणे पॉलिटेक्निकमधील शिक्षकांना राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मिळालेली नाही. या मंडळाने लवकर सूचना करावी. अडचणीतील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

चौकट

ऋतुराज पाटील यांची उच्चशिक्षणमंत्र्यांकडे मागणी

सध्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन परीक्षा देताना मोबाइल नेटवर्क नसणे, खंडित वीजपुरवठा यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ट्विटरद्वारे केली आहे. या पाच जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थी महापुरामुळे परीक्षेपासून वंचित राहू शकणार आहेत.

प्रतिक्रिया

महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे. ते लक्षात घेऊन तंत्रशिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणे योग्य ठरणार आहे.

-प्रशांत पट्टलवार, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन