शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा नसल्याने ‘पॉलिटेक्निक’च्या विद्यार्थ्यांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:21 IST

कोल्हापूर : महापुरामुळे मोबाइल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ...

कोल्हापूर : महापुरामुळे मोबाइल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा इंजिनिअरिंग) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहणार आहेत.

या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सत्रातील कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या परीक्षा दि. १३ जुलैपासून ऑनलाइन एमसीक्यू पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये पदविका अभियांत्रिकीच्या तिन्ही वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली आणि कोकणामध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोबाइल नेटवर्क, वीजपुरवठा खंडित झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचण निर्माण झाली आहे. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर परीक्षकांनी त्यांच्या पॉलिटेक्निकच्या परीक्षा कक्षातून ऑनलाइन नजर ठेवायची आहे; पण महापुरामुळे या परीक्षकांनादेखील पॉलिटेक्निकपर्यंत जाता येत नाही. या तांत्रिक अडचणीबाबत पुढे काय करायचे याची कोणतीही सूचना अधिकृतपणे पॉलिटेक्निकमधील शिक्षकांना राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मिळालेली नाही. या मंडळाने लवकर सूचना करावी. अडचणीतील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

चौकट

ऋतुराज पाटील यांची उच्चशिक्षणमंत्र्यांकडे मागणी

सध्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन परीक्षा देताना मोबाइल नेटवर्क नसणे, खंडित वीजपुरवठा यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येत आहे. याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे ट्विटरद्वारे केली आहे. या पाच जिल्ह्यांतील शेकडो विद्यार्थी महापुरामुळे परीक्षेपासून वंचित राहू शकणार आहेत.

प्रतिक्रिया

महापुराच्या नैसर्गिक आपत्तीमुळे कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अडचणीचे ठरत आहे. ते लक्षात घेऊन तंत्रशिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणे योग्य ठरणार आहे.

-प्रशांत पट्टलवार, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन