शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

‘कृष्णे’ला प्रदूषणाचा विळखा

By admin | Updated: January 3, 2015 00:10 IST

नृसिंहवाडी : नदी प्रवाहित करण्याची ग्रामस्थांची मागणी

नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा नदी प्रदूषित झाली आहे. नदीचे पाणी प्रवाहित करण्याची तसेच उपाययोजना राबविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सुप्रसिद्ध असे दत्तक्षेत्र असून, असंख्य भाविक या दत्तक्षेत्रावर श्री दत्त चरणांचे दर्शन घेण्यासाठी तसेच कृष्णा-पंचगंगा या पवित्र संगमस्थानावर स्नान करण्यासाठी येतात. मात्र, सध्या हिप्परगी बंधारावर बरगे घातले असल्याने अखंड वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी थांबलेले आहे. पाण्याचा प्रवाह थांबल्याने व गटार, नाल्यांचे पाणी थेट नदीत मिसळत असल्याने तसेच कोल्हापूर, इचलकरंजी शहरातील रसायनयुक्तसांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. पंचगंगा व कृष्णा नदी संगम ठिकाणी दूषित पाणी साचत असून, दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.कृष्णा नदीचे पाणी पूर्णपणे हिरवट झाले असून, नदीच्या पाण्यावर तरंगणारी घाण साठली आहे. पाण्याचा प्रवाह थांबला असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे लवकरात लवकर नदी प्रवाहित करण्याची गरज आहे. (वार्ताहर)कृष्णा नदीचे होणारे प्रदूषण निश्चितच खेदाची गोष्ट असून, देवस्थानमार्फत निर्माल्य अगर कचरा टाकण्यासाठी निर्माल्यकुंड ठेवूनदेखील बरेच भाविक श्रद्धेपोटी निर्माल्य नदीत विसर्जन करतात. तसेच देवस्थानच्यावतीने जाळी लावून वेळोवेळी तरंगणारी घाण नावेच्या साहाय्याने काढण्यात येते. तरीही पूर्ण नदी स्वच्छ होत नाही. नदीचे पाणी प्रवाहित करण्यासाठी योग्य त्या अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आले असून, मंदिर परिसरातील नदीपात्र स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.- संजय पुजारी, अध्यक्ष, दत्त देव संस्थान, नृसिंहवाडी.