शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रदूषण नियंत्रण मंडळ कागदोपत्रीच

By admin | Updated: March 28, 2015 00:05 IST

उच्च न्यायालयाचे ताशेरे; आवश्यक सदस्यांची नियुक्तीच नसल्याचे उघड

कोल्हापूर : राज्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त कागदोपत्रीच कार्यरत असल्याची गंभीर बाब शुक्रवारी पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयात उघडकीस आली. जलप्रदूषण प्रतिबंध कायद्यांतर्गत प्रदूषण नियंत्रण मंडळावर आवश्यक सदस्यांची नियुक्तीच अद्याप केलेली नाही. त्यामुळे संतप्त न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रभावहीन झाल्याचे ताशेरे ओढले.प्रदूषण मंडळाने आवश्यक सदस्यांच्या पूर्णवेळ नियुक्त्या किती कालावधीत करणार हे स्पष्ट करावे, असा आदेश राज्य शासनाला दिला. दरम्यान, पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसंदर्भात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. एच. पाटील व न्या. ए. व्ही. अचलिया यांच्या खंडपीठासमोर इचलकरंजी येथील दत्ता माने व सदा मलाबादे यांनी वकील धैर्यशील सुतार यांच्यातर्फे दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली.गेल्या ५ ते १० वर्षांत प्रदूषण मंडळाने पंचगंगा खोऱ्यातील प्रदूषण करणारे साखर कारखाने व इतर औद्योगिक आस्थापनांवर ‘बंद’ची कारवाई केली नाही, असे याचिकाकर्त्यांचे वकील सुतार यांनी निदर्शनाला आणून दिले. त्यावर प्रदूषण मंडळाच्या वकिलांनी बँक हमी जप्त करणे व फौजदारी करण्याच्या कारवाया प्रस्तावित केल्याचे निदर्शनाला आणून दिले; पण अशा कारवायांना लोक घाबरत नाहीत व कारागृहात जाण्यासही असे कारखानदार घाबरत नसल्याची टिप्पणी खंडपीठाने केली. ‘बंद’ची कारवाई कधी केली का, असा प्रश्न न्यायालयाने केला.यावर नुकतीच संबंधित साखर कारखान्यांसहित इतर औद्योगिक आस्थापनांना ‘बंद का करू नये,’ अशी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. सुनावणीसुद्धा झाली आहे. लवकरच कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांनी सांगितले. दरम्यान, सध्या पर्यावरण खात्याचे सचिवच मंडळाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहतात. पाच विविध खात्यांच्या प्रधान सचिवांची नियुक्ती आहे. महाराष्ट्र औद्योगिक वसाहत महामंडळ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे; परंतु इतर कोणत्याही पदांची नियुक्ती मंडळावर झाली नसल्याचे सुनावणीदरम्यान उघड झाले.काही दिवसांत काम पूर्णकोल्हापूर महापालिकेचा ७६ दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रकल्प पूर्ण झाला आहे. मात्र, निर्गतीच्या पाईपलाईनपैकी २०० मीटरचे काम अपूर्ण आहे. तेसुद्धा प्रगतिपथावर आहे. येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.