शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाला अखेर जाग

By admin | Updated: January 20, 2015 00:06 IST

उद्या बैठक : तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काढून जलपर्णी, मृत मासे, दूषित पाणी केले प्रवाहित

कुरूंदवाड : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी सुस्त झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला व पाटबंधारे विभागाला ‘लोकमत’च्या दणक्याने अखेर जाग आली. आज, सोमवारी सकाळी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेरवाड बंधाऱ्याचे बरगे काढून तुंबलेले जलपर्णी, मेलेले मासे व दूषित पाणी प्रवाहित केले. तर करवीरचे प्रातांधिकारी पाटील यांनी याप्रश्नी बुधवारी (दि. २१) दुपारी बैठकीचे आयोजन केले. त्यामुळे पंचगंगाकाठावरच्या नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.पंचगंगा नदीला दूषित पाण्यामुळे नदीतील मासे मेल्याने शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. मेलेले मासे बंधाऱ्याला तटल्याने व दूषित पाणी तुंबून राहिल्याने पाण्याला उग्र वास येत होता. जलपर्णी, मेलेले मासे व दूषित पाणी वाहून जाण्यासाठी काही बरगे काढून पाणी वाहते ठेवण्याचा निर्णय झाला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेले पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण समिती यांनी येथील नागरिकांच्या तीव्र भावनांचा अनुभव घेऊनही नदी प्रदूषणावर प्राथमिक उपाय म्हणून बरगे काढून पाणी वाहते ठेवणे गरजेचे होते, असे असतानाही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने व पाणी प्रदूषणाची तिव्रता वाढल्याने ‘लोकमत’ने प्रदूषणप्रश्नी अद्याप कारवाई शुन्य या मथळ्याखाली सोमवारच्या अंकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.कुरुंदवाड पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेरवाड बंधाऱ्याच्या चार सांडव्याचे बरगे काढून पाणी वाहते केले. त्यामुळे या बंधाऱ्याला तुंबलेले जलपर्णी, मेलेले मासे वाहून गेले. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून ‘लोकमत’च्या वृत्ताने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाग आल्याने नागरिक, आंदोलनकर्ते व पर्यावरणवादी कार्यकर्त्यांतून ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. (वार्ताहर)बुधवारी बैठकतेरवाड बंधाऱ्यावर आंदोलन होऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही कारवाईची हालचाल केले नसल्याचे ‘लोकमत’च्या वृत्ताने मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीचे अध्यक्ष करवीरचे प्रांताधिकारी प्रशांत पाटील यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांना फोनवरून याप्रश्नी निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि. २१) दुपारी करवीर प्रांत कार्यालयात सर्व विभाग अधिकारी व आंदोलनकर्त्यांची संयुक्त बैठक बोलावली आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.