शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

शाळी नदीचे पाणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाळी नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या मलकापूर नगरपालिकेने गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : शाळी नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या मलकापूर नगरपालिकेने गेल्या पंधरा वर्षांच्या नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. पालिकेने गेल्या दहा वर्षांपासून १ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना बंद ठेवली आहे. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे नदीच्या पाण्याला उग्र वास येत आहे. नागरिकांना नदी काठावरून जाताना तोंडाला रुमाल लावावा लागत आहे.

शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत.

शाळी नदीचा उगम पालेश्वर गावच्या डोंगर कपारीतून झाला आहे. या नदीवर पाटबंधारे विभागाने दीड टीएमसीचे धरण बांधले आहे. मलकापूर शहराच्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. पालिका स्थापन झाल्यापासून या नदीचे पाणी शहरातील नागरिक वापरत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शाळी नदीत शहरातील सांडपाणी, गटाराचे पाणी थेट मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीवर उन्हाळ्यात येळाणे गावाजवळ धरण बांधल्यामुळे नदीचे पाणी अडविले जाते. त्या पाण्यात सांडपाणी मिसळत आहे. पालिका प्रशासनाने नदीच्या प्रदूषित पाण्याकडे गांभीयाने पहिलेले नाही. स्वच्छ भारत अभियानात पालिकेला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मात्र पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी फारसे काम केले नाही. शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे येथील महिलांना कपडे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी एक किलोमीटर उचत किंवा पेरीड गावच्या हद्दीतील नदीत जावे लागत आहे. शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मलकापूर, येळाणे, कोपार्डे या गावांतील नागरिक व शेतकरी यांना होत आहे. पालिकेवर जनसुराज्य पक्ष, भाजप, शिवसेना या तीन पक्षांचे नगरसेवक निवडून जातात. यांची आलटून-पालटून सत्ता येते. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला.

‘अक्षम्य दुर्लक्ष’

पालिकेवर जनसुराज्य, भाजप व दलित महासंघाच्या युतीची सत्ता आहे, तर विरोधी गट म्हणून शिवसेना कार्यरत आहे. मात्र या दोन्हीही नदीच्या प्रदूषणाकडे यांनी दुर्लक्ष केले आहे. याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

फोटो

मलकापूर शहरातील सांडपाणी व गटारीचे पाणी शाळी नदीत मिसळत असल्यामुळे संपूर्ण पाणी प्रदूषित होऊन पाण्याला उग्र वास येत आहे.