शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शाळी नदीचे पाणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाळी नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या मलकापूर नगरपालिकेने गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : शाळी नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या मलकापूर नगरपालिकेने गेल्या पंधरा वर्षांच्या नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. पालिकेने गेल्या दहा वर्षांपासून १ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना बंद ठेवली आहे. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे नदीच्या पाण्याला उग्र वास येत आहे. नागरिकांना नदी काठावरून जाताना तोंडाला रुमाल लावावा लागत आहे.

शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत.

शाळी नदीचा उगम पालेश्वर गावच्या डोंगर कपारीतून झाला आहे. या नदीवर पाटबंधारे विभागाने दीड टीएमसीचे धरण बांधले आहे. मलकापूर शहराच्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. पालिका स्थापन झाल्यापासून या नदीचे पाणी शहरातील नागरिक वापरत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शाळी नदीत शहरातील सांडपाणी, गटाराचे पाणी थेट मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीवर उन्हाळ्यात येळाणे गावाजवळ धरण बांधल्यामुळे नदीचे पाणी अडविले जाते. त्या पाण्यात सांडपाणी मिसळत आहे. पालिका प्रशासनाने नदीच्या प्रदूषित पाण्याकडे गांभीयाने पहिलेले नाही. स्वच्छ भारत अभियानात पालिकेला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मात्र पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी फारसे काम केले नाही. शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे येथील महिलांना कपडे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी एक किलोमीटर उचत किंवा पेरीड गावच्या हद्दीतील नदीत जावे लागत आहे. शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मलकापूर, येळाणे, कोपार्डे या गावांतील नागरिक व शेतकरी यांना होत आहे. पालिकेवर जनसुराज्य पक्ष, भाजप, शिवसेना या तीन पक्षांचे नगरसेवक निवडून जातात. यांची आलटून-पालटून सत्ता येते. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला.

‘अक्षम्य दुर्लक्ष’

पालिकेवर जनसुराज्य, भाजप व दलित महासंघाच्या युतीची सत्ता आहे, तर विरोधी गट म्हणून शिवसेना कार्यरत आहे. मात्र या दोन्हीही नदीच्या प्रदूषणाकडे यांनी दुर्लक्ष केले आहे. याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

फोटो

मलकापूर शहरातील सांडपाणी व गटारीचे पाणी शाळी नदीत मिसळत असल्यामुळे संपूर्ण पाणी प्रदूषित होऊन पाण्याला उग्र वास येत आहे.