शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळी नदीचे पाणी प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शाळी नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या मलकापूर नगरपालिकेने गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : शाळी नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या मलकापूर नगरपालिकेने गेल्या पंधरा वर्षांच्या नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. पालिकेने गेल्या दहा वर्षांपासून १ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना बंद ठेवली आहे. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे नदीच्या पाण्याला उग्र वास येत आहे. नागरिकांना नदी काठावरून जाताना तोंडाला रुमाल लावावा लागत आहे.

शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत.

शाळी नदीचा उगम पालेश्वर गावच्या डोंगर कपारीतून झाला आहे. या नदीवर पाटबंधारे विभागाने दीड टीएमसीचे धरण बांधले आहे. मलकापूर शहराच्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. पालिका स्थापन झाल्यापासून या नदीचे पाणी शहरातील नागरिक वापरत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शाळी नदीत शहरातील सांडपाणी, गटाराचे पाणी थेट मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीवर उन्हाळ्यात येळाणे गावाजवळ धरण बांधल्यामुळे नदीचे पाणी अडविले जाते. त्या पाण्यात सांडपाणी मिसळत आहे. पालिका प्रशासनाने नदीच्या प्रदूषित पाण्याकडे गांभीयाने पहिलेले नाही. स्वच्छ भारत अभियानात पालिकेला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मात्र पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी फारसे काम केले नाही. शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे येथील महिलांना कपडे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी एक किलोमीटर उचत किंवा पेरीड गावच्या हद्दीतील नदीत जावे लागत आहे. शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मलकापूर, येळाणे, कोपार्डे या गावांतील नागरिक व शेतकरी यांना होत आहे. पालिकेवर जनसुराज्य पक्ष, भाजप, शिवसेना या तीन पक्षांचे नगरसेवक निवडून जातात. यांची आलटून-पालटून सत्ता येते. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला.

‘अक्षम्य दुर्लक्ष’

पालिकेवर जनसुराज्य, भाजप व दलित महासंघाच्या युतीची सत्ता आहे, तर विरोधी गट म्हणून शिवसेना कार्यरत आहे. मात्र या दोन्हीही नदीच्या प्रदूषणाकडे यांनी दुर्लक्ष केले आहे. याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

फोटो

मलकापूर शहरातील सांडपाणी व गटारीचे पाणी शाळी नदीत मिसळत असल्यामुळे संपूर्ण पाणी प्रदूषित होऊन पाण्याला उग्र वास येत आहे.