शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

'या' ११ पैकी एक ओळखपत्र असेल तर करता येणार मतदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:32 IST

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २३) जिल्ह्यात मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन

ठळक मुद्देकेवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी ( २३ एप्रिल) जिल्ह्यात मतदान होत आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत घेऊन जावे किंवा मतदाराकडे छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करू शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत, मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या अकरा कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनचालक परवाना, केंद्र /राज्य शासन/ सार्वजनिक उपक्रम/ सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे फोटो असलेले ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँक पासबुक, पॅनकार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन कागदपत्र आणि खासदार, आमदार व विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड ही कागदपत्रे मतदारांना मतदान केंद्रांवर ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी स्पष्ट केले.

केवळ मतदार छायाचित्र ओळखपत्र आहे म्हणून मतदान करता येईल असे नाही तर मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. नावनोंदणी अथवा पडताळणीसाठी https://eci.gov.in/voter/voter/ या वेबसाईटला भेट द्या. मतदान केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती ही ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही तर त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा वरील अकरा ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapur-pcकोल्हापूर