शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

बेळगावातील जिल्हा, तालुका पंचायतीसाठी उद्या मतदान

By admin | Updated: February 11, 2016 23:42 IST

राष्ट्रीय पक्षांची कसोटी : महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचे प्राबल्य असणाऱ्या भागात आपले उमेदवार निवडून आणणे प्रतिष्ठेचे केले आहे. सध्याचे वातावरण पाहता समिती खानापूर आणि बेळगाव तालुक्यात बाजी मारेल असे दिसते. जिल्ह्यातील तालुका पंचायतीच्या ३४५, तर जिल्हा पंचायतीच्या ९० जागांसाठी उद्या, शनिवारी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा, पोलीस सज्ज झाले आहेत.या निवडणुकीत सर्वच राष्ट्रीय पक्षांनी मतासाठी थैल्या सैल सोडल्या आहेत. मतदारांंना प्रलोभने दाखवून प्रसंगी धाकधपटशा दाखवून मराठी भाषिकांची मते आपल्या पक्षालाच मिळवीत या दृष्टीने त्यांची धडपड सुरू आहे. कन्नडिगांची बाजू घेणारे पोलीसही प्रचाराच्या दरम्यान भलते सलते आक्षेप घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी आपली ताकद लावली आहे. इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथील नंदगड, बेळगावातील कडोली बेळगुंदी, सीमा आंदोलनाच्या अस्मितेचे केंद्रबिदू असलेल्या येळ्ळूर गावात जाहीर सभा घेतल्या, तर एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार प्रा. रवी गायकवाड यांनी मुतगा, किनाये येथे जाहीर सभा घेतल्या. या दोन्हीही नेत्यांनी एकीकरण समितीलाच मतदान करा, असे आवाहन मराठी भाषिक मतदारांना केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अलीकडील आंदोलनात तरुण पिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. त्यावरून बेळगाव आणि खानापूर तालुका पंचायतीवर एकीकरण समितीचा झेंडा फडकेल, असे वातावरण आहे. येळ्ळूर जिल्हा पंचायत मतदारसंघात अर्जुन गोरलसारख्या अनुभवी नेत्याला एकीकरण समितीने तिकीट दिले आहे. येळ्ळूर गावाच्या वेशीवर डौलाने फडकत असलेला महाराष्ट्र राज्य फलक २७ जुलैला कर्नाटक सरकारने अन्यायाने काढला. यावेळी कानडी पोलिसांचा लाठी हल्ला सहन केलेल्या नेत्यालाच एकीकरण समितीने तिकीट दिले आहे. त्यामुळे कर्नाटक प्रशासन आणि सरकारच्या विरोधातील सूर दरवेळेप्र्रमाणे मतदानात प्रकट होणार आहे. जे येळ्ळूर गावात पेरल जातंय ते सीमाभागात उगवलं जातंय, अशी भावना आहे. त्यामुळे येळ्ळूरमधला मराठी माणूस आणि एकीकरण समितीची लहर संपूर्ण सीमा भागात उमटत आहे असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत मराठी माणसाला घवघवीत यश मिळेल, अशी खात्री राजकीय विश्लेषक देताना दिसत आहेत . महाराष्ट्र एकीकरण समितीत पूर्वीपासूनच दुही आहे. मात्र, त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत मराठी माणसाला फारसा जाणवणार नाही. राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मागील वेळेस बेळगाव तालुका आणि जिल्हा पंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून भाजपने म्हणावा तेवढा जनसंपर्क ठेवला नाही. या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. भाजप आणि काँग्रेसच्या लढाईत बेळगाव आणि खानापूर तालुक्यात मराठी माणसाचं नेतृत्व करणारी एकीकरण समिती बाजी मारेल यात शंका नाही. समितीची कसोटीबेळगाव तालुका पंचायतीत एकूण ४५ सदस्य आहेत. त्यापैकी मराठीबहुल ३२ ठिकाणी, तर खानापूर तालुक्यातील एकूण २५ पैकी २० ठिकाणी एकीकरण समिती निवडणूक लढवत आहे. बेळगाव जिल्ह्णातील जिल्हा पंचायतीच्या एकूण ९० जागांपैकी बेळगावमधील १२ पैकी १०, तर खानापूरमध्ये एकूण सहापैकी ५ जागांवर एकीकरण समिती निवडणूक लढवत आहे. जिल्हा पंचायतीच्या दृष्टिकोनातून बेळगाव आणि खानापूर तालुक्यांतील एकूण १८ जागांपैकी दहा जागांवर जरी एकीकरण समितीचे उमेदवार निवडून आले तरी ते किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी निवडणुकीचे मैदान एकतर्फी मारण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने आपल्या राज्य आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांना तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले होते. तालुका पंचायतीच्या ३४५, तर जिल्हा पंचायतीच्या ९० जागामहाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांची ताकद येळ्ळूरमध्ये कानडी पोलिसांचा लाठी हल्ला सहन केलेल्या अर्जुन गोरलसारख्या अनुभवी नेत्याला समितीने तिकीट दिले आहे.