शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मनपा यंत्रणेवर राजकीय दबाव

By admin | Updated: August 4, 2015 00:58 IST

दोन्ही काँग्रेसचा आरोप : अधिकाऱ्यांची जबाबदारी काढून घेण्याची मागणी करणार

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावर शहरात सोमवारी तत्काळ प्रतिक्रिया उमटली. काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी सायंकाळी आयुक्त पी. शिवशंकर यांना धारेवर धरले. महापालिका निवडणूक यंत्रणेवर कोणाचा तरी दबाब असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तसेच चुकीच्या पद्धतीने कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करावे,अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचेही सांगण्यात आले. पत्रकार परिषद संपताच काहीशा गोंधळेल्या मन:स्थितीत तणावाखाली असलेले आयुक्त पी. शिवशंकर तातडीने मनपा कार्यालयातून बाहेर पडले. निवडणूक कार्यालयात त्यांनी धाव घेतली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, उपमहापौर ज्योत्सना पवार- मेढे, प्रा.जयंत पाटील, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव, नगरसेवक विनायक फाळके, महेश गायकवाड आदींनी आयुक्तांची भेट घेतली आणि आरक्षण बदलाच्या निर्णयाबद्दल आपला राग व्यक्त केला. (प्रतिनिधी)निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारया संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे लाटकर यांनी सांगितले. ज्या कर्मचाऱ्यांनी या कामात हलगर्जीपणा केला आणि ज्यांच्यामुळे ही नामुष्की ओढावली त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राजकीय दबावाने नवा निर्णयकोणाच्या तरी राजकीय दबावामुळे प्रशासनाने नव्याने आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप राजेश लाटकर व जयंत पाटील यांनी केला. आयोगाच्या निर्देशांची माहिती का करून घेतली नाही? निरीक्षकांना सोडतीवेळी हजर ठेवण्याची विनंती का केली नाही, असे प्रश्न उपस्थित करून आयुक्तांना निरूत्तर केले. प्रभाग रचनाही चुकीची : पाटील मनपाने केलेली प्रभाग रचना आणि आरक्षणाची पद्धत अत्यंत चुकीची आहे, असा आक्षेप प्रा.जयंत पाटील यांनी घेतला आहे. जर नव्याने प्रभाग रचना केली असेल आणि एकेका प्रभागाचे तीन-चार तुकडे झाले असतील तर २००५ व २०१० सालच्या निवडणुकीचे आरक्षण विचारात घेणे योग्य नाही. निवडणूक यंत्रणेचा हा गलथानपणा आहे, असे प्रा. पाटील म्हणाले. इंद्रजित बोंद्रे यांच्या प्रभागाचे तीन नव्या प्रभागात विभाजन केले आहे. मग तिन्ही प्रभागांवर अनुसूचित जातीचे आरक्षण कसे टाकले, असा सवाल त्यांनी केला.