शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

सोयीच्या राजकारणाने ‘राष्ट्रवादी’ अस्वस्थ

By admin | Updated: February 3, 2015 00:27 IST

‘गोकुळ’ची लढाई : नेत्यांची अगोदरच हत्यारे म्यान

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षवाढीपेक्षा ‘सोयीचे राजकारण’ सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत आहे. महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी नेत्यांनी आपल्या मतदारसंघांतील सोयीचे राजकारण पाहण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीअगोदर स्वबळावर दहा जागा लढविण्याची वल्गना जिल्ह्यातील नेत्यांनी केली पण प्रत्यक्षात आठ उमेदवार उभे करताना पक्षाची दमछाक उडाली. मागील पाच वर्षांत प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यात पक्षवाढीपेक्षा आपआपले मतदारसंघ सुरक्षित करण्याचे काम केल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची पुरती धुळधाण उडाली. स्वत:ची जागा सुरक्षित करण्यासाठी करवीर व दक्षिण मतदारसंघात निवडणुकीआधीच तलवार म्यान केली आहे. दक्षिण मतदारसंघातील उरले-सुरले कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्याने येथे आगामी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. करवीर व पन्हाळ्यात यापेक्षा वेगळी अवस्था नाही. करवीर व दक्षिणमध्ये उघड शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने स्वत:चेच खच्चीकरण केले. विधानसभा निवडणुकीनंतर तरी पक्षवाढीसाठी नेते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती; पण आता कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. जिल्हास्तरीय मेळावा घेऊन त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. गेल्यावेळेला मित्रपक्षांना बरोबर घेत राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला होता. या निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत बंडाळीचा फायदा उठवत पक्ष बळकटीची नामी संधी राष्ट्रवादीला होती; पण ठराव गोळा करतानाच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी हत्यार खाली ठेवल्याचे दिसते. रणजितसिंह पाटील यांना सत्तारूढ पॅनेलमध्ये घेत अरुंधती घाटगे यांना पॅनेलमधून वगळणे एवढाच अजेंठा आमदार हसन मुश्रीफ यांचा दिसत आहे. जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी या निवडणुकीबाबत ‘नरोवा कुंजरोवा’ अशीच भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील इतर प्रमुख कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)