शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोयीच्या राजकारणाने ‘राष्ट्रवादी’ अस्वस्थ

By admin | Updated: February 3, 2015 00:27 IST

‘गोकुळ’ची लढाई : नेत्यांची अगोदरच हत्यारे म्यान

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षवाढीपेक्षा ‘सोयीचे राजकारण’ सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत आहे. महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’ निवडणुकीसाठी नेत्यांनी आपल्या मतदारसंघांतील सोयीचे राजकारण पाहण्यास सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीअगोदर स्वबळावर दहा जागा लढविण्याची वल्गना जिल्ह्यातील नेत्यांनी केली पण प्रत्यक्षात आठ उमेदवार उभे करताना पक्षाची दमछाक उडाली. मागील पाच वर्षांत प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यात पक्षवाढीपेक्षा आपआपले मतदारसंघ सुरक्षित करण्याचे काम केल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची पुरती धुळधाण उडाली. स्वत:ची जागा सुरक्षित करण्यासाठी करवीर व दक्षिण मतदारसंघात निवडणुकीआधीच तलवार म्यान केली आहे. दक्षिण मतदारसंघातील उरले-सुरले कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाल्याने येथे आगामी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. करवीर व पन्हाळ्यात यापेक्षा वेगळी अवस्था नाही. करवीर व दक्षिणमध्ये उघड शिवसेना व भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन राष्ट्रवादीने स्वत:चेच खच्चीकरण केले. विधानसभा निवडणुकीनंतर तरी पक्षवाढीसाठी नेते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती; पण आता कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. जिल्हास्तरीय मेळावा घेऊन त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. राजकीय सत्ताकेंद्र असलेल्या ‘गोकुळ’च्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. गेल्यावेळेला मित्रपक्षांना बरोबर घेत राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला होता. या निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत बंडाळीचा फायदा उठवत पक्ष बळकटीची नामी संधी राष्ट्रवादीला होती; पण ठराव गोळा करतानाच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी हत्यार खाली ठेवल्याचे दिसते. रणजितसिंह पाटील यांना सत्तारूढ पॅनेलमध्ये घेत अरुंधती घाटगे यांना पॅनेलमधून वगळणे एवढाच अजेंठा आमदार हसन मुश्रीफ यांचा दिसत आहे. जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी या निवडणुकीबाबत ‘नरोवा कुंजरोवा’ अशीच भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील इतर प्रमुख कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)