शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

जिल्हा परिषदेसाठी राजकीय पक्षांचा गृहपाठ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 01:15 IST

सध्या तरी स्वबळाची भाषा : आघाडीशिवाय पर्याय नसल्याने सर्वांच्याच हालचाली सावध

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक जरी पुढील वर्षी होणार असली, तरी सर्वच पक्षांनी आतापासूनच गृहपाठाला सुरुवात केली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्याने आता या दोन्ही पक्षांनाही जिल्हा परिषदेच्या सत्तेचे स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी आणि राष्ट्रवादी सत्तेतील सहभागासाठी ताकद लावणार आहे. मात्र, स्वतंत्र लढण्यासाठी कुणीही कितीही उड्या मारल्या तरीही आघाडीशिवाय पर्याय नसल्याने या हालचालीही सावधपणे सुरू आहेत. पुढील वर्षी मार्चमध्ये जिल्हा परिषदेच्या सध्याच्या सदस्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने ६९ पैकी सर्वाधिक ३१ जागा मिळवत खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ची साथ घेत सत्ता संपादन केली. त्याआधीच्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेत वाटा दिला होता. मात्र, यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेकडे फिरकूही दिले नाही. गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्णातील राजकारणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. केंद्रात भाजप आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. जिथे संधी मिळेल तेथे भाजपच्या कार्यक र्त्याला संधी देण्याची भूमिका असलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य कसे वाढतील याच्या जोडणीत संघटनमंत्री बाबा देसाई यांना घेऊन लागलेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामीण भागात पाच आमदार आहेत. त्यांच्या शक्तीवर शिवसेना आश्वासक आहे. जिल्ह्णाचे ताकदवान नेतृत्व असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे सध्या भाजपच्या जवळ आहेत. राष्ट्रवादी आणि दोन्ही काँग्रेस आपले सर्वाधिक सदस्य कसे निवडून येतील यासाठीच्या नियोजनात आहेत. जनसुराज्य, स्वाभिमानी व अन्य छोट्या-मोठ्या आघाड्या, गट हे कुणाबरोबर तरी संगत करूनच या राजकारणामध्ये सक्रिय राहणार आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तीन तालुक्यांतील कुणाचे सदस्य जास्त संख्येने निवडून येतात यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे. अजून आरक्षण पडलेले नाही. एकदा आरक्षण पडले की मग पुढच्या हालचाली वेगावणार आहेत.