शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

जिल्हा परिषदेसाठी राजकीय पक्षांचा गृहपाठ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2016 01:15 IST

सध्या तरी स्वबळाची भाषा : आघाडीशिवाय पर्याय नसल्याने सर्वांच्याच हालचाली सावध

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची निवडणूक जरी पुढील वर्षी होणार असली, तरी सर्वच पक्षांनी आतापासूनच गृहपाठाला सुरुवात केली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आल्याने आता या दोन्ही पक्षांनाही जिल्हा परिषदेच्या सत्तेचे स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी आणि राष्ट्रवादी सत्तेतील सहभागासाठी ताकद लावणार आहे. मात्र, स्वतंत्र लढण्यासाठी कुणीही कितीही उड्या मारल्या तरीही आघाडीशिवाय पर्याय नसल्याने या हालचालीही सावधपणे सुरू आहेत. पुढील वर्षी मार्चमध्ये जिल्हा परिषदेच्या सध्याच्या सदस्यांची मुदत संपणार आहे. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने ६९ पैकी सर्वाधिक ३१ जागा मिळवत खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ची साथ घेत सत्ता संपादन केली. त्याआधीच्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीने काँग्रेसला सत्तेत वाटा दिला होता. मात्र, यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेकडे फिरकूही दिले नाही. गेल्या साडेचार वर्षांत जिल्ह्णातील राजकारणामध्ये कमालीचा बदल झाला आहे. केंद्रात भाजप आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. जिथे संधी मिळेल तेथे भाजपच्या कार्यक र्त्याला संधी देण्याची भूमिका असलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य कसे वाढतील याच्या जोडणीत संघटनमंत्री बाबा देसाई यांना घेऊन लागलेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे ग्रामीण भागात पाच आमदार आहेत. त्यांच्या शक्तीवर शिवसेना आश्वासक आहे. जिल्ह्णाचे ताकदवान नेतृत्व असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे सध्या भाजपच्या जवळ आहेत. राष्ट्रवादी आणि दोन्ही काँग्रेस आपले सर्वाधिक सदस्य कसे निवडून येतील यासाठीच्या नियोजनात आहेत. जनसुराज्य, स्वाभिमानी व अन्य छोट्या-मोठ्या आघाड्या, गट हे कुणाबरोबर तरी संगत करूनच या राजकारणामध्ये सक्रिय राहणार आहेत. करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तीन तालुक्यांतील कुणाचे सदस्य जास्त संख्येने निवडून येतात यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे. अजून आरक्षण पडलेले नाही. एकदा आरक्षण पडले की मग पुढच्या हालचाली वेगावणार आहेत.