शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मध्यमवर्गाच्या संख्येमुळे राजकीय प्रारूप बदलले : अशोक चौसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:30 IST

इचलकरंजी : मध्यमवर्गाच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भारतात राजकीय व सामाजिक प्रारूप बदलले आहे. जगातील ...

इचलकरंजी : मध्यमवर्गाच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भारतात राजकीय व सामाजिक प्रारूप बदलले आहे. जगातील अनेक देशांत गेल्या दोन-तीन दशकांत असे घडताना दिसत आहे. तसेच भारतातही वर्गाची जागा आता जातींनी व्यापली आहे. देशातील ४० कोटी मध्यमवर्गाचे सोशल प्रोफाईल बदलले आहे, हे भारतीय राजकारणाच्या बदलत्या दिशेमागील मुख्य वास्तव आहे. नव्याने पुन्हा सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप आघाडी सरकारला मिळालेल्या जनादेशामागे हेही एक महत्त्वाचे कारण आहे, असे मत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.येथील समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने आयोजित व्याख्यानात ‘भारतीय राजकारणाची बदलती दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जे. एफ. पाटील होते. यावेळी प्राचार्य आनंद मेणसे सहवक्ते होते.यावेळी डॉ. चौसाळकर म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत कोणताही जनादेश कायमस्वरूपी नसतो. तसेच या निवडणुकीत निवडणूक आयोगाने सक्षम सरकारी यंत्रणा - दळणवळणाची सुविधा, मत देणे व मोजणीसाठीची मशिनरी उपलब्ध असूनही निवडणूक प्रक्रिया दीर्घकालीन करणे आणि आचारसंहितेकडे काटेकोर लक्ष न देता सत्ताधार्जीण वर्तन करणे, ३७० कलम बदलण्यापासून ते घटना दुरुस्तीपर्यंतची प्रक्रिया, अशा विविध मुद्द्यांवर मांडणी केली.प्राचार्य मेणसे म्हणाले, संसदीय लोकशाही पद्धतीऐवजी ‘नमो विरुद्ध रागा’ असे स्वरूप जाणीवपूर्वक आणले गेले; पण ते चुकीचे आहे. ती अध्यक्षीय पद्धती व हुकूमशाहीकडे नेणारी पावले आहेत. स्वायत्त संस्था मोडीत काढल्या जात आहेत. विरोधकांशी सुडाने वागले जात आहे. भारतीय राजकारणाची बदलती दिशा घातक आहे. ती बदलायची असेल, तर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेऊन संघटितपणे व जागरूकपणे काम केले पाहिजे.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, डॉ. चिदानंद आवळेकर, अस्लम तडसरकर, प्रा. डी. डी. चौगुले, डॉ. सुनील कांबळे, सुनील इनामदार, आदींनी मनोगत व्यक्त केले.चर्चासत्रास कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव या जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी आभारमानले.