शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

मध्यमवर्गाच्या संख्येमुळे राजकीय प्रारूप बदलले : अशोक चौसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:30 IST

इचलकरंजी : मध्यमवर्गाच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भारतात राजकीय व सामाजिक प्रारूप बदलले आहे. जगातील ...

इचलकरंजी : मध्यमवर्गाच्या संख्येत गेल्या काही वर्षांत वेगाने होत असलेल्या वाढीमुळे भारतात राजकीय व सामाजिक प्रारूप बदलले आहे. जगातील अनेक देशांत गेल्या दोन-तीन दशकांत असे घडताना दिसत आहे. तसेच भारतातही वर्गाची जागा आता जातींनी व्यापली आहे. देशातील ४० कोटी मध्यमवर्गाचे सोशल प्रोफाईल बदलले आहे, हे भारतीय राजकारणाच्या बदलत्या दिशेमागील मुख्य वास्तव आहे. नव्याने पुन्हा सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजप आघाडी सरकारला मिळालेल्या जनादेशामागे हेही एक महत्त्वाचे कारण आहे, असे मत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले.येथील समाजवादी प्रबोधिनीच्यावतीने आयोजित व्याख्यानात ‘भारतीय राजकारणाची बदलती दिशा’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. जे. एफ. पाटील होते. यावेळी प्राचार्य आनंद मेणसे सहवक्ते होते.यावेळी डॉ. चौसाळकर म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत कोणताही जनादेश कायमस्वरूपी नसतो. तसेच या निवडणुकीत निवडणूक आयोगाने सक्षम सरकारी यंत्रणा - दळणवळणाची सुविधा, मत देणे व मोजणीसाठीची मशिनरी उपलब्ध असूनही निवडणूक प्रक्रिया दीर्घकालीन करणे आणि आचारसंहितेकडे काटेकोर लक्ष न देता सत्ताधार्जीण वर्तन करणे, ३७० कलम बदलण्यापासून ते घटना दुरुस्तीपर्यंतची प्रक्रिया, अशा विविध मुद्द्यांवर मांडणी केली.प्राचार्य मेणसे म्हणाले, संसदीय लोकशाही पद्धतीऐवजी ‘नमो विरुद्ध रागा’ असे स्वरूप जाणीवपूर्वक आणले गेले; पण ते चुकीचे आहे. ती अध्यक्षीय पद्धती व हुकूमशाहीकडे नेणारी पावले आहेत. स्वायत्त संस्था मोडीत काढल्या जात आहेत. विरोधकांशी सुडाने वागले जात आहे. भारतीय राजकारणाची बदलती दिशा घातक आहे. ती बदलायची असेल, तर सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेऊन संघटितपणे व जागरूकपणे काम केले पाहिजे.प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी नगरसेवक शशांक बावचकर, डॉ. चिदानंद आवळेकर, अस्लम तडसरकर, प्रा. डी. डी. चौगुले, डॉ. सुनील कांबळे, सुनील इनामदार, आदींनी मनोगत व्यक्त केले.चर्चासत्रास कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बेळगाव या जिल्ह्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी आभारमानले.