शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

गेळवडेत राजकीय वादातून मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:58 IST

मलकापूर/कोल्हापूर : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या गटात रविवारी सकाळी जोरदार ...

मलकापूर/कोल्हापूर : गेळवडे (ता. शाहूवाडी) येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्ष यांच्या गटात रविवारी सकाळी जोरदार मारामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी तलवार, काठ्या, दगड, दांडक्याने केलेल्या हल्ल्यात आठजण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या मारामारीमुळे गावात तणाव पसरला असून, सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सीताराम ऊर्फ बाबू सखाराम लाड (वय ४८) यांचा हात तुटल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.अधिक माहिती अशी, गेळवडे येथील ग्रामपंचायत निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली आहे. त्यापासून येथील दोन राजकीय गटांत सतत वादावादीचे प्रकार घडत आहेत.तीन दिवसांपूर्वी सीताराम लाडयांच्या मामाच्या मुलाला मारहाण केली होती.तसेच त्यांच्या पाळीव कुत्र्यालाही मारहाण झाली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी मुंबईहून सीताराम लाड व त्यांचे कार्यकर्ते विरोधी गटाचे तानाजी पाटील व बाळकू पाटील यांच्याकडे रविवारी सकाळी गेले. यावेळी लाड आणि पाटील गटांत जोरदार राडा झाला. तानाजी पाटील, शरद पाटील, बाळकू पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारीने सीताराम लाड यांच्यावर वार केला. त्यामध्ये लाड यांचा हात तुटून ते गंभीर जखमी झाले; तर आठजण जखमी झाले. दोन गटांत राडा झाल्याने गावात तणाव निर्माण झाला. जखमींना तत्काळ ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. घटनेची माहिती समजताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. गावात रात्री उशिरापर्यंत सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी सीपीआर रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शाहूवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.